Wednesday, February 11, 2015

अभिनंदन आणि शुभेच्छा

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा जो प्रचंड विजय झाला, त्याचं विश्‍लेषण करायला सर्व शब्द, सर्व युक्तिवाद अपुरे आहेत. भाजप च्या पराभवाला शब्द वापरून काही उपयोग नाही. काँग्रेसच्या नामशेष होण्याला शब्द वापरायची गरज नाही.अंतिमत: हा मतदारांनीच घडवून आणलेला ‘आप’चा प्रचंड, संपूर्ण विजय आहे. मे 2014 पासून भाजप च्या ‘अश्‍वमेधा’चा घोडा सर्वत्र अजिंक्य संचार करत होता - लोकसभेनंतर महाराष्ट्र, जम्मू-काश्मिर, झारखंड - तो ‘अश्‍वमेधा’चा घोडा ‘आप’नं दिल्लीत नुसता अडवला नाही, पकडून नेलाय. आता यानंतर येणार्‍या उत्तरप्रदेश, बिहारच्या निवडणुकीत तो घोडा सोडवून आणून भाजप चा‘अश्‍वमेध’ चालू राहणार की आता ‘आप’चा अश्‍वमेध चालू होणार - हे पुढे दिसेलच. आता, भारताच्या राजकारणात उलथापालथ घडवून आणेल, नवी राजकीय समीकरणं सुरू होतील असा ‘जनादेश’ दिल्लीनं दिलाय. दिल्ली म्हणजे देश नाही, पण दिल्लीत घडतं त्याचा प्रभाव, परिणाम देशभर पसरणं अगदी साहजिक आहे.

डिसेंबर 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप 32 जागा घेऊन सर्वांत मोठा पक्ष बनला, पण स्पष्ट बहुमतापासून 4जागा दूर राहिला. याउलट अत्यंत अनपेक्षितपणे 27 जागा घेऊन ‘आप’ उदयाला आला. 8 जागा घेऊन काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला. स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सरकार न बनवण्याची भूमिका भाजप नं घेतली. केजरीवाल यांनी आधी तशीच भूमिका घेतली. पण नंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार बनवलं. ते 49 दिवस चालवलं. आणि 14 फेब्रुवारीला त्यांनी राजीनामा दिला.तेव्हापासून दिल्लीला सरकार नव्हतं. तेव्हा ‘आप’ला 29% मतं मिळाली होती, तर भाजप ला 32%. मग लोकसभा निवडणुकीत दिल्लीतल्या सातही जागा भाजप ला मिळाल्या होत्या. तेव्हा भाजप ला 46% मतं मिळाली आणि विधानसभेच्या 70 पैकी 60मतदारसंघांमध्ये आघाडी होती. त्यावेळी सुद्धा ‘आप’ला एकही जागा मिळाली नसली तरी मतांचं प्रमाण 29 वरून वाढून 32% वर पोचलं होतं. काँग्रेसची मतांच्या टक्केवारीतली घसरण अप्रतिहतपणे चालू होती. त्या टप्प्यात काँग्रेसची घटत जाणारी मतं‘आप’कडे वळत होती.

लोकसभा निवडणुकीनंतर नीतीधैर्य हरवलेला, गलितगात्र झालेला काँग्रेस पक्ष आत्मचिंतन करून नव्या पायावर उभं राहण्याचं,घराणेशाहीच्या वर उठण्याचं चिन्ह अजून तरी दिसत नाही. आत्ता दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा ‘फॅक्टर’ मोजलाच जात नव्हता. तो शून्यावर येऊन ठेपला. भाजप ला रोखण्यासाठी काँग्रेसनंच ‘आप’शी ‘टॅक्टिकल’ तडजोड करून मतं ‘आप’कडे वळवली असतील, असा एक युक्तिवाद केला जातो. तसं असलं तर ते विरोधकांचं नाक कापण्यासाठी स्वत:च्या पायावर कुर्‍हाड चालवण्यासारखं आहे. जास्त शक्यता अशीच आहे की मतदारांनीच मतांची विभागणी टाळण्यासाठी आपण होऊन ‘आप’कडे धाव घेतली.

मोदी लाटेच्या प्रभावात भाजप एकामागून एक राज्यं जिंकत चालला होता. तेव्हा केजरीवाल आणि ‘आप’ यांनी दिल्लीत जमिनीवरच्या विषयांकडे लक्ष देत पक्षबांधणी करणं चालवलं होतं. लोकसभेतल्या पराभवानंतर पक्षाची पडझड चालू झाली. त्यात काही काळ असं दिसलं की आता ‘आप’ची अवतार-समाप्ती होते की काय. त्या सर्व शक्यतांवर मात करत ‘आप’नं असा तुफान विजय मिळवला की एकदम देशाच्या राजकारणावर प्रभाव पडेल. देशाच्या राजकीय क्षितिजावर राजकीय राष्ट्रीय नेता - पक्ष म्हणून केजरीवाल आणि ‘आप’ यांचा उदय झालेला आहे. आता जर ‘आप’नं 5 वर्षं दिल्लीला स्वच्छ आणि कार्यक्षम सरकार दिलं तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ भाजप ला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो. अर्थात यातून योग्य धडे घेतले तर उत्तरप्रदेश-बिहारच्या विधानसभा जिंकत, दिल्लीतलं केंद्र सरकार समर्थपणे चालवत, खरोखरच ‘सब का साथ सब का विकास’घडवला तर भाजप ही 2019 मध्ये विजयावर शिक्कामोर्तब करू शकतो. इतकंच काय, आता संपल्यासारखा दिसणारा, वागणारा काँग्रेसही ‘कमबॅक’ करू शकतो - त्यासाठी काँग्रेसला घराणेशाहीतून वर उठायला लागेल - असं आपलं मला वाटतं बुवा! आत्ताच्या आणि सततच्या पराभवानंतर आता ‘प्रियांका लाव, काँग्रेस बचाव’ एवढीच जर काँग्रेसची राजकीय प्रतिभा चालणार असेल, तर मात्र काँग्रेसचं पुनरुत्थान अवघड आहे.

भाजप कडून घडल्या असतील अशा चुकांची चिकित्सा चालू आहे - त्या धोरणात्मक किंवा डावपेचात्मक असतील. अती आत्मविश्‍वास नडला का, मतदारांना गृहीत धरलं गेलं का, मोदी-शहा सांगतील तो शेवटचा शब्द या नादात दिल्ली भाजप च्या स्थानिक नेत्यांकडे दुर्लक्ष झालं का, त्यातून वर परत किरण बेदींना पक्षात घेऊन मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यामुळे पक्षांतर्गत बंड झालं का, मुळात किरण बेदींना पक्षात घेण्याची ‘राजकीय गरज’ होण्याएवढी स्थिती निर्माण का झाली,हा मोदी-शहांच्या नेतृत्वावर व्यक्त झालेला अविश्‍वास आहे का, यामुळे त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचे आवाज भाजप मध्ये उठतील का... अशा सर्व प्रश्‍नांची उत्तरं पक्षाला शोधावी लागणार आहेत. पण या सर्वांहून मूलभूत कारणं पुढीलप्रमाणे असू शकतील-

1) दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप नं मतदारासमोर ‘व्हिजन’ - आणि कार्यक्रम मांडलेला दिसला नाही. उलट नकारात्मक प्रचारावर आणि केजरीवाल यांच्यावर टीका - प्रसंगी पातळी सोडून - करण्यावर भर दिसला. यामुळे निवडणुकीचा अजेंडा केजरीवाल यांना ‘सेट’ करता आला आणि राजकीय घडामोडींच्या मध्यभागी राहता आलं. ‘सब का साथ सब का विकास’विसरल्यासारखी भाजप ची मोहीम होती.

2) केंद्रातलं सरकार येऊन 8 महिने झाले, पण अजून ‘लोकपाल’ नेमण्याची काही हालचाल दिसत नाही.

3) विदेशातला काळा पैसा परत आणू - या निवडणूक वचनावर थोडी हालचाल दिसते, पण ती ठोस, समाधानकारक नाही.

यामुळे हे सरकार भ्रष्टाचार-निर्मूलनाबद्दल गंभीर आहे का याबद्दल दिल्लीच्या मतदाराच्या मनात शंका निर्माण होऊ शकते.

4) ओबामांची एवढी ऐतिहासिक भारतभेट झाली तिचा दिल्ली मतदारावर काही प्रभाव पडला नाही. उलट नरेंद्र मोदींच्या दहा लाखाच्या वेशभूषेची चर्चा जास्त झाली (करण्यात आली?) पण भाजप कडून त्याबद्दलचा काही खुलासा सांगण्यात आल्याचं दिसत नाही. त्याचा मतदारांवर विपरीत परिणाम झालेला असू शकतो.

5) मतदानापूर्वीच्या शुक्रवार नमाजाच्या वेळी शाही इमाम यांनी मुस्लिम मतदाराला भाजप चा उमेदवार पाडण्यासाठी मतदान करण्याचं ‘सेक्युलर’ आवाहन केलं! त्यामुळे डिसेंबर 2013 ची विधानसभा, एप्रिल-मे 2014 मधली लोकसभा, या निवडणुकांच्या वेळी काँग्रेस आणि ‘आप’ मध्ये झालेली मुस्लिम मतांची विभागणी - यावेळी ‘आप’कडे वळलेली असू शकते.

काही भाष्यकार हा जनतेनं व्यक्त केलेला मोदी सरकारवरचा अविश्‍वास म्हणतात. यात चांगलीच अतिशयोक्ती आहे. ही दिल्ली विधानसभेच्या 70 जागांची निवडणूक होती - भारतीय मतदार लोकसभेसाठी राष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करून मतदान करतो तर विधानसभेसाठी स्थानिक मुद्द्यांचा, असं वारंवार दिसून आलंय. यात भारतीय मतदाराचं शहाणपण दिसून आलंय. त्या शहाणपणाचा आदर करत जनमताचा कौल स्वीकारायला हवा. म्हणून केजरीवाल आणि ‘आप’ यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा.

स्वत: पंतप्रधानांनी फोन करून केजरीवाल यांचं अभिनंदन केलं, केंद्र सरकारच्या सर्व सहकार्याचं वचन दिलं. अशी जर प्रथा पडून गेली तर भारतीय लोकशाही अधिक समृद्ध होईल.

मतदारांनी तर राजकीय पक्षांना आणि व्यवस्थेला कडक नोटीस दिली.

आता त्याची दखल कशी घेतली जाते, ते पाहायचं.

Tuesday, February 10, 2015

डॉवसंतराव गोवारीकर
 
 
डॉवसंतराव गोवारीकर आता आपल्यात नाहीत.
एकेका घराण्याला प्रतिभेचं वरदान लाभलेलं असतंआपल्या प्रतिभेनं देशाचंविश्वाचं भलं करण्याचं वरदान लाभलेलं असतं.
दाभोळकर घराणं - नरेंद्र दाभोळकरांसहित सर्व दाभोळकर बंधू देवदत्तदत्तप्रसादश्री.....
आमटे घराणं - बाबासाधनाताई - त्यांची दोन मुलंसुनाआता नातवंडं...
जाधव घराणं - अर्थशास्त्रज्ञ ‘आमचा बापकार नरेंद्र जाधवIAS अधिकारी जनार्दन जाधव आणि बंधू...
देशसेवेचीसमाजसेवेचीप्रतिभासंपन्नतेची अशी घराणेशाही महाराष्ट्रातभारतवर्षात बहरली पाहिजेगांधीजी महाराष्ट्रालाकार्यकर्त्यांचं मोहोळ’ म्हणत असतअशी परंपरा पुढे चालवणारंस्वतंत्र प्रतिभेनं त्या परंपरेत भर घालणारं असं आणखी एक घराणं -
गोवारीकर घराणं.
डॉवसंतराव गोवारीकरांचे बंधू डॉशंकरराव गोवारीकर स्वतएक शास्त्रज्ञ आणि विचारवंतवहिनी दीपा गोवारीकर - मराठीत मोजकंचपण नेमकंबांधेसूद साहित्य सादर केलेल्या लेखिकापुतण्या आशुतोष - कसलेला उत्तम दिग्दर्शक - ‘लगानचा...
असे सगळे आहेत आपल्यात.
असावेतहीआपापलं आरोग्यपूर्णप्रतिभावंत शतायुषी योगदान देण्यासाठी.
पण आता डॉवसंतराव नाहीतत्यांची उणीव जाणवत राहणार.
विक्रम साराभाईंच्या दूरदर्शी वैज्ञानिक ‘स्कूलमध्ये ते विकसित झाले. ‘पॉलिमर सायन्स’ या गुंतागुंतीच्या विषयात त्यांनी Ph.D.आणि जागतिक पातळी गाठलीविक्रम साराभाईंच्या नेतृत्वाखाली भारताची - एकूणच विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राचीत्यात विशेषत:अवकाश-विज्ञानाची ‘व्हिजन’ प्रत्यक्षात आणायला ते सहभागी झालेपुढे तर त्यांनी भारताच्या अवकाश-विज्ञानातल्या प्रगतीचं नेतृत्व केलंकेरळमध्ये - तिरुवनंतपुरम्जवळच्या थुंबा इथल्या VSSC विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे ते प्रमुख होतेत्यावेळी ते दहा हजारपेक्षा जास्त शास्त्रज्ञांचं नेतृत्व करत होतेते नेतृत्व नंतर त्यांनी भारत सरकारच्या संपूर्ण विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचं केलं(DST - Department of Science & Technology, Govt. of India) पुढे पंतप्रधान राजीव गांधींनी त्यांना पंतप्रधानांचे विज्ञान-तंत्रज्ञान विषयक सल्लागार म्हणून नेमलंशासकीय व्यवस्थेतल्या नियमांनुसार होणार्या निवृत्तीनंतर त्यांना पुणे विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून नेमण्याचं महाराष्ट्र शासनाला सुचलं ही विशेष आनंदाची बाब होतीत्यामुळे कुलगुरु पदाची सुद्धा शान वाढली.अगदी अलिकडची - अगदीच शरीर थकलेली काही थोडी वर्षं सोडली तर तसे ते निवृत्त कधीच झाले नाहीतऔपचारिक निवृत्तीनंतरही - शेती - खतं विषयक कोश तयार करणं - भारत 100 कोटी लोकसंख्या पार करेल हे आधी लक्षात घेऊन समायोजन कसं करायचं - यावरचा ग्रंथ त्यांनी संपादित करून सिद्ध केला होताशिवाय शेवटपर्यंत ते पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष या नात्यानं शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते.
IAS होण्यापूर्वी दहा वर्षं मी ज्ञान प्रबोधिनीचा कार्यकर्ता होतोत्या वर्षांमध्ये त्यांना 1981 पासून जवळून पाहण्याची मला संधी मिळाली होती. 1981 मध्ये ज्ञान प्रबोधिनीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला होता - तो कार्य्रक्रम फर्ग्युसन कॉलेजच्या अँफी थिएटरमध्ये काल झाल्यासारखा लक्षात आहे.
सगळ्याच  आठवणी  अशा  कालच  कायआता वर्तमानाच्या एका क्षणामध्ये सामावलेल्या असतातच.
विज्ञान क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली म्हणून केलेल्या सत्काराला उत्तर देताना सहज हसतहसत त्यांनी VSSC ची माहिती दिली,पुढच्या योजना सांगून ते म्हणाले, ‘जरूर VSSC पाहायला या - आणि आमचं काही चुकत असेल तर कान पकडा!’ माणसं काही वेळा काहीतरी एवढंसं करतात पण मानवतेमध्ये मोठी क्रांती केल्याची ‘पोज’ घेतातहे म्हणतायत, ‘आमचं काही चुकत असेल तर कान पकडा...’ त्यांचा आणखी जवळून सहवास लाभल्यावर लक्षात आलं की ती त्यांनी सत्कारापुरती धारण केलेली सार्वजनिक भूमिका नव्हती,  ते  तटस्थपणे स्वत:कडे  पाहण्याच्या शास्त्रीय भूमिकेतूनच वृत्तीच्या नम्रतेचा आविष्कार घडवत होते.
1985 मध्ये ते VSSC चे प्रमुख असताना मला त्यांनी स्वततडडउ दाखवलंसमजावून सांगितलंथुंबाच्या TERLS (Thumba Equatorial Rocket Launching Station) ची सुरुवात एका पडक्या चर्चपासून झालीरॉकेट अवकाशात सोडायला शास्त्रीय दृष्ट्या अचूक असलेली जागा - म्हणजे तिरुवनंतपुरम्जवळचं थुंबा - त्या जागेवर चर्च होतंविक्रम साराभाईंनी ‘फादरकडे त्या चर्चची मागणी केलीत्या ‘फादरनं ते चर्च आनंदानं सुपूर्द केलं भारताच्या अवकाश कार्यक्रमासाठी - तिथे उभं राहिलं तेही भारताचं,जगाचं भव्य विज्ञानमंदीरचतिथे एका बुधवारी सोडलेल्या पेन्सिल रॉकेटपासून पुढे SLV, ASLV, PSLV, GSLV... 1986 नंतर ही प्रगती त्यांनी मला समजावून सांगितलीते सर्व पाहतानाचं भारावून जाणं अजून लक्षात आहेत्यापेक्षा प्रेरित होणं जास्त लक्षात आहेआणि त्याहीपलिकडे जाऊन - भारताकडे ही क्षमता आहेया जाणीवेनं दिलेला राष्ट्रीय आत्मविश्वास तर माझ्या अस्तित्वाचाच भाग बनून गेलाय.
त्यांच्याशी ‘बाबा’ म्हणण्याएवढं वडीलधारं नातं तयार झालंते त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळेते DST चे सचिवपंतप्रधानांचे सल्लागार होते तेव्हा माझा दिल्लीत कार्यकर्ता-पत्रकार म्हणून वावर होताकिंवा पंजाबकाश्मिरमध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या काही उचापत्या करायला जायचं तर दिल्ली माझा बेस असायचातेव्हा अनेक वेळा माझा मुक्काम त्यांच्या घरी असायचादिवसभर पंतप्रधानांबरोबर (किंवा सरकारी यंत्रणेबरोबर!) काम करून घरी आल्यावर ते पित्याच्या प्रेमळपणे चौकशी करायचेपण त्याच वेळी त्यांचं ‘क्वेश्चनिंग’ सुद्धा धारदार ‘नो नॉन्सेन्स्’ प्रकारातलं असायचंते आपल्याला न दुखावताविचार करायला भाग पाडायचेआपल्या विचारांनास्पष्टता यायला मदत व्हायची.
मार्च 1986 मध्ये मी UPSC ची मुख्य परीक्षा पार झालोतेव्हा माहीतच नव्हतं की दिल्लीत मुलाखत म्हणजे काय असतंतर मी फोन करून दिल्लीत पंतप्रधानांच्या सल्लागारांकडेच सल्ला मागितलात्यांनीही तो न रागावता दिला.
IAS झाल्यावर मसुरीत ‘जॉईन’ होताना आपल्या वतीनंएक प्रकारे ‘गॅरेंटर’ - हमी देणारी - दोन नावं द्यायची असतातत्यातलं माझं गॅरेंटर असलेलं एक नाव होतं - डॉवसंतराव गोवारीकर.
1995 मध्ये मी पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी असण्याच्या काळात काही दिवस सुट्टी घेऊन ‘विजयपथ’ लिहून पूर्ण केलं होतं.त्याचं प्रकाशन त्यांच्या आणि सर्वार्थानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ IAS अधिकारी  असलेल्या बीजीदेशमुख सर - यांच्या हस्ते झालं होतं. (आता दोघंही दिग्गज आपल्यात नाहीत.)
पुढे 1995-96 मध्ये मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा उपसचिव होतोतेव्हा त्यांनी कचर्यापासून खत आणि ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलेला होता - देवनारमध्येत्या प्रकल्पाच्या कामात मला थोडासा वाटा उचलता आला होता.
चाणक्य मंडल परिवारच्या स्थापनेनंतर शक्य होतं त्या वेळा त्यांनी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं.
आता ते आपल्यात नाहीतजीवन चालू राहतंचपण त्यांची उणीव भासत राहणाररुखरुख राहणार.
इतक्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला लाभलंय - पण आपल्याच हातून अजून तरी फारसं काही काम झालेलं नाही - अशी तर माझी वैयक्तिक रुखरुख असतेच.
काम करत राहणंप्रतिभा जागी करतजागी ठेवत नव्या नव्या दिशा शोधणं हेच त्याला उत्तर आहे.
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रांमध्ये भारत - केवळ जगाबरोबरच नाही तर जगाच्या पुढे जाणं - भारत केवळ अनुकरण करणारा नाही तर नवं संशोधन करणारा देश होणं -
ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Friday, February 6, 2015

कार्यकर्ता अधिकारी – भाग 8
 

तसा एकूण प्रशिक्षण कालावधी आणि त्यातही मसुरीचे दिवस मी भरपूर ‘एन्जॉय’ केलेत्यावेळी आमच्या बॅचच्या थोडं आधीअ‍ॅकॅडमीतच्या जुन्या शैलीतल्या लाकडी इमारती आगीत भस्मसात झाल्या होत्यात्यामुळे सगळ्याच व्यवस्थांमध्ये एक तात्पुरतेपणा होताअभ्यास विषयांची मुख्य मार्गदर्शन सत्रं ‘सरदार पटेल हॉल’ (SPH) मध्ये व्हायची - तिथे लोखंडीफोल्डिंगच्या बर्याच गंजलेल्या खुर्च्या होत्या - पण समोर चाललेल्या एकाहून एक सखोल सत्रांमुळे गंजलेल्या खुर्च्यांचा विसर पडायचा. (खुर्च्यांना गंज चढू नये म्हणून काळजी करतोयस तसा मानालाही गंज चढू नये म्हणून काळजी कर हो शाम!)
लायब्ररी मस्त होतीमी भरपूर वाचून घेतलंबर्यापैकी जिम होतीमाझा त्यावेळी चालू असलेला व्यायाम नियमित चालू राहिला.मी भरपूर टेनिस आणि स्क्वॉश खेळून घेतलंहॉर्स रायडिंगरायफल शूटिंग या ‘ऐच्छिक’ बाबी होत्या - पण अर्थातच मी त्या शिकून घेतल्याहॉर्स रायडिंगच्या ‘ट्रॉट’, ‘कँटर’, ‘गॅलपिंग’... या सगळ्या पायर्या पार केल्या. (मजा तर आलीचपुढे रायगडचा कलेक्टर असताना त्याचा उपयोग पण झाला.) मसुरी परिसरातल्या ‘केम्प्टी फॉल्स्पासून हरिद्वार-ऋषिकेशसकट हिमालय परिसरातसुट्ट्यांच्या दिवशी भरपूर भटकंती केलीअ‍ॅकॅडमीत चांगला ‘फिल्म क्लब’ - आणि दुनियाभरच्या विविध भाषांमधल्या उत्तमोत्तम चित्रपटांचा चांगला संग्रह होता - समग्र सत्यजीत रे - त्यांची ‘पथेर पांचाली’ सहित ‘अपु ट्रिलॉजी’ - शहरी शोषणाचं पिळवटून टाकणारं चित्रण करणारा ‘जनारण्य’... हे मी अ‍ॅकॅडमीत पाहिलेत्यावरची पुस्तकं वाचलीजाणकारांकडून भाष्य ऐकलं,त्यांच्याशी चर्चा केलीसार्वकालिक श्रेष्ठ असा जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावाचा सार्वकालिक श्रेष्ठ ‘राशोमान’, हॉलिवुडच्यामॅग्निफिसंट सेव्हनचा मूळ जपानी चित्रपट ‘सेव्हन सामुराई’ - असे खूप काही - चित्रपटविषयककलाविषयक जाणिवा प्रगल्भ व्हायला मदत झाली.
प्रशिक्षण काळात अभ्यास करून काही पेपर्स सादर करायचे होतेमी IAS होण्यापूर्वी ‘शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव’ मागणार्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होतोम्हणून 1979-80 मध्ये कांद्याच्या भावावरून झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं लादलेल्या 3 रुक्विंटलच्या जागी कांद्याच्या शेतकर्याला 70 रुक्विंटल भाव मिळाला होता - त्याचे चाकण परिसरातल्या शेतकर्यावर झालेले परिणाम - यावर मी अभ्यास करून पेपर सादर केला होताएक वर्ष कांद्याला भाव मिळाल्यामुळे शेतकर्याच्या हातात जास्त पैसा आलातो शेतकर्यानं शेती-तंत्रज्ञान सुधारायला वापरला - त्यामुळे उत्पादन आणखी वाढलं - असं माझं ‘फाईंडिंग’ होतं. ‘शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव’ मिळाल्यास शहरी औद्योगिक क्षेत्राकडून शेती - ग्रामीण क्षेत्राचं होणारं शोषण थांबलंशेती - ग्रामीण क्षेत्राची क्रमश: ‘दरिद्रीकरणाची’ प्रक्रिया थांबेल - ग्रामीण भागात क्रयशक्ती निर्माण होईलत्यामुळे भांडवल निर्मितीची प्रक्रिया सुरू होऊन - ग्रामीण भागात नवे उद्योगत्यातून रोजगाराच्या नव्या संधी - परिणामी आणखी क्रयशक्ती आणि भांडवल निर्मिती - असं विकासाचं चक्र सुरू होईल... असं सर्व आम्ही शेतकरी आंदोलनात सांगत होतो - तेच चाकण परिसराच्या माझ्या अभ्यासात दिसून आलं.
असाच पेपर मी ‘ड्रायलँड फार्मिंग’ विषयावर तयार केला होतादुष्काळप्रवणपाणी टंचाईग्रस्त भागातपाण्याची बचत करत शेती कशी करता येईल यावरचा तो पेपर होतापुढे प्रशासनातल्या सर्व वर्षांमध्ये आणि आजही तो अभ्यास कामी येतो.
* * *
IAS अधिकार्याच्या प्रशिक्षणाचा 2 वर्षांचा कालावधी अतिशय सुनियोजित आहे : साडेतीन-चार वर्षांच्या ‘फाउंडेशन कोर्सनंतर वेगवेगळ्या ‘अ‍ॅटॅचमेंट्स्’ आहेतअधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळण्यापूर्वी राष्ट्रीय जीवनाच्या वेगवेगळ्या संस्था तुम्ही जवळून पाहाव्यात अशी त्यामागे दृष्टी आहे.
त्यानुसार मला डिसेंबरच्या ऐन बर्फाळ कडाक्याच्या थंडीत काश्मिर मध्येभारतीय लष्कराच्या 10th Infantry Division च्या,ब्रिगेड 1/8 GR (गुरखा रेजिमेंटबरोबर 3 आठवडे ‘आर्मी अ‍ॅटॅचमेंट’ करण्याची संधी मिळालीगोरखालँड आंदोलनाचं नेतृत्व करणारे सुभाष घीशिंग 1/8 GR मध्ये होतेभारताचे कर्तबगार सरसेनापतीफील्ड मार्शल माणेकशा 2/8 GR मध्ये होतेमी प्रशिक्षण घेताना 1/8 GR ब्रिगेड 161 चा घटक होतोCo-Commanding Officer होते लोकनील टेंबे - आणि लष्कराच्या भाषेत2IC सेकंड इन कमांड - मेजर परशुराम नावाचा रुबाबदारदिलदार मल्याळी अधिकारीसेवेतून राजीनामा दिल्यानंतर 1999 च्या जून-जुलैमध्ये झालेल्या कारगिल युद्धातही मी भारतीय सैन्याबरोबर द्रास-कारगिल भागात होतोती व्यवस्था लावून देण्यात पुन्हा तेच होतेश्रीनगरमधल्या ‘बटवारा गेट’ या भागात भारतीय लष्कराचा तळ आहे - तिथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुढे मेजर परशुराम मारले गेलेत्यांनी दहशतवाद्यांना मशीनगन्स् घेऊन घुसताना पाहिलंमेजर परशुराम रिसेप्शन ऑफिसमध्ये होतेत्यांनी आपल्या लष्करी तळाला धोक्याचा इशारा दिलाइतर सहकार्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलंदहशतवाद्यांचा हल्ला स्वत:च्या अंगावर घेतलाते भारतासाठी शहीद झाले. 1986 साली 3 आठवडे त्यांच्या दयामाया न बाळगणार्या शिस्तीची मला मजा आली होती.
हिमालयातला एक ट्रेक करायचा असतोतो मी अवघडातला अवघड असा एक ट्रेक म्हणून ‘पिंडारी ग्लेशियरचा ट्रेक केला -हिमालयातले चालण्याचे 110 कि.मी. - आणि समुद्रसपाटीपासून 15 हजार फुटांवर... आणखी धमाल.
अ‍ॅकॅडमीत एकेका प्रांताचा ‘डे’ साजरा व्हायचा - तेव्हा त्या त्या प्रांताची वैशिष्ट्यं सादर करायची असतातत्यावेळी मी ढोल-ताशा-झांज (आणि तोंड!) भरपूर वाजवून घेतलं.
SPH मध्ये ‘विविध गुणदर्शन’ व्हायचंत्यात मी लिहिलेली ‘संघर्ष’ नावाची मूळ मराठी एकांकिका - हिंदी भाषांतर करून सादर केली. (त्या काळी मी स्टेजवर सुद्धा नाटकं करायचो!) दोनच पात्रं असलेलं हे नाटक - भोवतीच्या परिस्थितीबाबत अत्यंत संवेदनशील असलेला एकव्यावहारिक जगतात तो ‘वेडा’ ठरवला जातो - आणि त्याचं ‘वेड’ समजणारापण त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर - अशी दोनच पात्रंडॉक्टरची भूमिका केली होती IAS मधला सहकारी - डॉ.सुहेल अख्तर यानंतो मध्यप्रदेशातला होतात्याला सिक्किम केडर मिळालं होतं (‘वेड्याचा रोल कुणी केला हे काय वेगळं सांगायला हवं का?!)
त्यावेळी टी.व्हीवर - एकच राष्ट्रीय दूरदर्शन - DD चॅनेल होता - अजून केबल टी.व्ही.ची रेलचेल आली नव्हतीतेव्हा दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ चालू होतं - त्यापायी देशाला वेड लागलेलं होतं. (थोडे मूठभर ‘बुद्धिवादीसोडता रामायण-महाभारताचं देशाला हजारो वर्षं वेड लागलेलं आहे - जगाला सुद्धा.) तर दर रविवारी सकाळी देशभरचे रस्ते सुनसान असायचेलोक स्नान करून गंधटिळा लावूनचपला-बूट न घालता किंवा काढून - टी.व्ही.समोर - शिस्तीत वेळेपूर्वी 5मिनिटं आधीच येऊन बसायचे - तिथे भारत देश वक्तशीरपणा पाळतोलोक टी.व्ही.ला कुंकू लावायचेनारळ वाढवायचेहार घालायचेमालिकेत काम करणार्यानं ‘ड्रिंक्स्’ घेणं बंद केलं होतं - लोकही त्या अभिनेत्यांनाच राम आणि सीता समजून त्यांच्या पाया पडायचेपुढे रामाचं काम केलेला अरुण गोविल काँग्रेसमध्ये गेला आणि सीतेचं काम करणारी दीपिका चिखलिया आणि रावण - अरविंद त्रिवेदी भाजप मध्ये!
आम्ही पण न चुकता अॅकॅडमीमध्ये रविवारी सकाळी 9 म्हणजे 8.55 ला स्नान करूनचपला-बूट न घालता बसायचो.
आमच्याबरोबर असाच न चुकता सुहेल अख्तरही असायचा.
मित्रामित्रांमध्ये गंमत चालते (leg pulling) तसा मी एका रविवारी रामायणाचा ‘एपिसोड’ चालू असताना मधल्या ‘ब्रेकमध्ये सुहेल अख्तरला म्हणालो, ‘यार तू यह क्या कर रहा हैहर इतवार को हमारे साथ रामायण देखता है - तेरी मजहब वाले तेरे को मजहब से निकाल देंगे ना!’
तर एकदम गंभीर होऊन तो म्हणाला, ‘ऐसा क्यों कह रहे हो अविनाशरामायण क्या मेरी भी विरासत नहीं है?’ अनेक धर्मांधांना हे समजलं तर ‘भारत’ समर्थ होईल.
(त्या अख्तर नावातच काहीतरी जादू आहे - आठवा - जावेदफरहान नावाचे अख्तर.)

Monday, February 2, 2015

मराठेशाहीचा इतिहास
पानिपत. १४ जानेवारी १७६१. मराठ्यांच्या इतिहासातला, पराभवातला सुद्धा दैदिप्यमान अध्याय. भारताच्या इतिहासाचं एक निर्णायक वळण आणि अजूनही भरून निघालेली जखम.

          
  मराठ्यांचा इतिहास या संज्ञेला अलिकडच्या काही वर्षांमध्ये एक जातीय अर्थ येऊन बसला, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला संपूर्ण भारतवर्षासाठी लढण्याची प्रेरणा आणि दिशा दिली. संपूर्ण देश अत्याचारी आक्रमकांच्या तावडीतून मुक्त करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं ध्येय ठेवून महाराष्ट्र देशासाठी, देशभर लढला - त्याचं नाव मराठ्यांचा इतिहास’. भारताच्या इतिहासातलं अठरावं शतक मराठ्यांचं शतकआहे. इंग्रजांनी भारत मुघलांकडून नाही जिंकला, मराठ्यांकडून जिंकला. हे आपल्यापेक्षा तत्कालीन इंग्रज अधिकारी आणि इतिहासकारांना समजलेलं होतं. दिल्लीत मुघल बादशहा असला तरी भारताची प्रभुसत्ता खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या हातात आहे आणि मराठे प्रबळ आहेत तोवर आपल्याला भारत ताब्यात घेता येणार नाही याची नीट जाण इंग्रज अधिकाऱ्यांना होती.
            औरंगजेबानंतर मुघल साम्राज्य खिळखिळं झालं, त्यामुळे तयार झालेल्या पोकळीत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार झाला असा एक अत्यंत चुकीचा पर्स्पेक्टिव्हमांडला जातो. या पर्स्पेक्टिव्हचंच पुढचं  समीकरण म्हणजे - मुघल साम्राज्याचं पतन आणि इंग्रज राज्याचा उदय यांच्या संधीकाळात मराठ्यांचा इतिहास - एक जणू तळटीप - म्हणून पाहिला जातो, मांडला जातो. ऐतिहासिक वस्तुस्थिती ही आहे की बलाढ्य औरंगजेबाला खतम केलं मराठ्यांनी. मुघल साम्राज्य खिळखिळं केलं तेच मुळी मराठ्यांनी. संपूर्ण मध्ययुगात संपूर्ण भारतभर, भारतासाठी लढू म्हणणारी शक्ती - म्हणजे मराठ्यांचा इतिहास. आज काही काम व्हायला हवं असेल - तर ते म्हणजे - मराठ्यांच्या इतिहासाला भारताच्या इतिहासातलं न्याय्य स्थान मिळवून देणं.
            त्या दृष्टीनं पडलेलं एक पाऊल म्हणता येईल - रघुनाथ यादव चित्रगुप्त विरचित बखर पानिपतची - या आकाराला छोट्या, पण महत्त्वाला मोठ्या - ग्रंथाचं प्रकाशन. पानिपताच्या लढाईची कहाणी सांगणारी ही बखर माधवराव पेशव्यांना पदाची वस्त्रं मिळाली, इथे संपते. बखरीची रचना १७६१ मध्येच झाली.
       शिक्षणानं, व्यवसायानं सर्जन असलेल्या डॉ. उदय कुलकर्णी यांनी ब्रिटनमधल्या रॉयल एशियाटिक सोसायटीतून ही बखर शोधून काढून, परिश्रमपूर्वक संपादन करून, आता सादर केली आहे. डॉ. उदय कुलकर्णी यांचाच पानिपत युद्धावरचा ऐतिहासिक ग्रंथ 'Solstice at Panipat'  - यापूर्वीच प्रसिद्ध झाला आहे.
       ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी चार्लस् मॅलेट याला मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायला कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यानं मराठ्यांच्या इतिहासाचा आराखडा तयार करून कलकत्त्याला, कंपनीच्या भारतातल्या मुख्यालयात पाठवणं सुरू केलं होतं. त्यासाठी त्यानं ही पानिपतची बखरशोधून इंग्लिशमध्ये अनुवादित करून घेतली होती १७९१ मध्ये - यात इंग्रजांची ऐतिहासिक जाणीव’ (Historical consciousness) दिसून येते. ज्या देशाला जिंकून घ्यायचंय, ज्याच्यावर राज्य करायचंय - तो देश, तो समाज, त्याचा धर्म, संस्कृती, भाषा समजली पाहिजे - (म्हणजे ती मोडून काढता येईल!) या भूमिकेतून इंग्रज आणि युरोपीय (काही, सर्वच नाही) इतिहासकारांनी भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला, मांडणी केली. आपण मात्र आपल्याच इतिहासाकडे तेव्हाही दुर्लक्ष करत होतो - आजही करतो. भारतीय संस्कृतीच्या रचनेतऐतिहासिक जाणिवेचा अभाव दिसून येतो का - असा एक अस्वस्थ करणारा प्रश्न पडावा - इतपत तरी परिस्थिती आहे.
Cover letter of Panipat campaign's description dated 1761, copied in 1791 for Sir Charles Malet.
       ही परिस्थिती बदलण्याचं एक मोलाचं पाऊल म्हणजे पानिपतची बखर’.
       शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जी दिशा दिली - जे काम नेमून दिलं - संपूर्ण भारत अत्याचारी आक्रमकांच्या तावडीतून मुक्त करणं - ते जवळजवळ पूर्ण करत आणलं होतं - त्याचं वर्णन केलं जातं मराठे अटकेपार पोचलेया विधानानं. अटक, म्हणजे भारतावर मध्ययुगात सतत आक्रमणं येत होती - तो खैबरखिंड उतरल्यावर - सिंधू नदीच्या काठावरचा किल्ला - लष्करी  ठाणंतिथे  भगवं निशाण फडकवलं - ही बातमी मराठ्यांचा सेनापती रघुनाथराव पेशवा - राघोबादादा - पुण्यात आपला भाऊ नानासाहेब पेशव्याला कळवताना अशा अर्थाचं म्हणतात कीथोरल्या आबासाहेबांनी’ - म्हणजे शिवाजी महाराजांनी नेमून दिलेलं काम आपण जवळजवळ पूर्ण करत आणलं आहे - आता आपण आदेश द्याल तर काबूल-कंदाहारवर सुद्धा भगवं निशाण लावू.’ त्यावर उत्तर देताना नानासाहेब पेशवा अशा अर्थाचं म्हणतात की मनसुबा चांगला आहे - पण इकडे हिंदुस्थानात आपल्याला नवी समस्या उद्भवली आहे - आधी तिचा बंदोबस्त करायला हवा - हा संदर्भ प्लासीच्या लढाईचा (१७५७) आहे. त्यात ईस्ट इंडिया कंपनीचा विजय हा आपल्याला - भारताला धोका आहे, हे मराठ्यांना समजलेलं होतं. बंगालच्या चौथाई, सरदेशमुखीचे अधिकार मराठ्यांकडे होते. आपण हिंदुसथानच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्वासाठी लढतो आहोत, त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे याचं मराठ्यांना भान होतं.
       मराठ्यांच्या शत्रूंना सुद्धा होतं. म्हणून तर नजीबखान रोहिल्यानं अहमदशहा अब्दालीला बोलावून घेतलं. आता तू जर आला नाहीस तर भारतावर मराठ्यांचं - म्हणजे हिंदूंचं – ‘काफिरांचंराज्य येईल असं नजीबखान रोहिला कळवतो. त्यानुसार मराठ्यांचा पराभव करून दिल्लीत हिंदुस्थानचा बादशहा म्हणून  राज्याभिषेक करून घेण्याचा धरून अहमदशहा अब्दाली आला - त्याचं वर्णन त्यानं स्वत: जिहादअसं केलंय.
            भारतावर आक्रमण करताना अहमदशहा अब्दालीनं सदाशिवराव भाऊंना एक पत्र पाठवलं होतं, ते यापानिपतच्या बखरीतदिलंय. ते अत्यंत उर्मट भाषेतलं, दम देणारं पत्र आहे. त्याचा मतितार्थ आहे की, गपगुमान नर्मदेच्या दक्षिणेकडे निघून जावं. अब्दाली म्हणतो - तो प्रदेश तुम्हाला नेमून दितोय. त्याला सदाशिवराव भाऊंनी पाठवलेलं उत्तरही तितकंच आक्रमक, जबरदस्त आत्मविश्वासानं भरलेलं आहे. भाऊ अब्दालीला म्हणतात, ‘हे हिंदूंची पातशाही, येथील बंदोबस्त करणे तो आम्हीच करावा... तुम्ही नेम करून देणार कोण? आमचे चित्तास येईल ते आम्ही आपले मते करणार. रूमशामची खबर घ्यावी (रोम, सिरिया, काँन्स्टँटिनोपल ऊर्फ इस्तंबूल) तेथे पावेतो मुळुक काबीज करावा हा आमचा हिया. तेथे दुरानी, इरान तो काये? तुम्ही आपल्या वाटे अटक पार करोन भाईचारा रक्षोन माघारा जाणे...’
            अब्दालीला माघारा जाताच आलं नाही पाहिजे, खतमच करून टाकू, म्हणून मराठ्यांनी त्याच्या सैन्याला वळसा घालून अफगाणिस्ताकडची परतीची वाट बंद केली. मराठ्यांची तलवार आधीची ५० वर्षं भारतभर तळपत होती. पराभव माहीत नव्हता. जबरदस्त रग आणि आत्मविश्वास होता.
           
त्याला साजेसा पराक्रम करत पानिपतची लढाई मराठ्यांनी जवळजवळ जिंकली होती. अब्दालीनं आजचा दिवस आपला नाही असं समजून, सैन्य माघारी बोलावण्याचं शिंग फुंकण्याच्याही सूचना दिल्या होत्या. हातातोंडाशी आलेल्या प्रचंड मोठ्या ऐतिहासिक विजयाचं रूपांतर तितक्यात प्रचंड मोठ्या ऐतिहासिक पराभवात झालं. ही पानिपतची लढाई जिंकली असती तर भारताच्या इतिहासाला वेगळं वळण लागलं असतं. भारतीय राष्ट्रीयत्वाचा मध्ययुगातला आविष्कार म्हणजे मराठ्यांचा इतिहास आहे. पानिपतच्या पराभवामुळे सुद्धा भारताच्या इतिहासाला वेगळं वळण लागलं. बंगाल आणि मद्रासमध्ये इंग्रजांना आपलं आसन स्थिर करायला संधी मिळाली. त्याची किंमत भारतानं पुढे दीडशे वर्षं मोजली. काही अर्थांनी आपण अजूनही इंग्रजी राज्यातल्या गुलामीची किंमत मोजतो आहोत.
            या बखरीतून तसा एक बोचरा मुद्दा स्पष्ट व्हायला मदत होते. भाऊंशी मतभेद झाले म्हणून ऐन युद्धाच्या सकाळी मल्हारराव होळकर सैन्य घेऊन बाहेर पडले - असं उलटसुलट बोललं जातं. या बखरीतून खुलासा होतो की मल्हारराव होळकर युद्ध सोडून बाहेर पडले नाहीत, तर दिवसाच्या शेवटाकडे, हातातोंडाशी आलेला विजय पराभवात परावर्तित होतोय हे लक्षात आल्यावर सदाशिवराव भाऊंनी मल्हारराव होळकरांना सांगितलं की बायका-मुलांना सुरक्षितपणे घेऊन तुम्ही इथून बाहेर पडा.
            आणि विश्वासराव पेशव्याच्या मृत्यूमुळे अस्वस्थ झालेले भाऊ हत्तीवरून उतरून घोड्यावर स्वार झाले. गर्दीत घुसले. गर्दीस मिळाले.
            अडीचशे वर्षं लोटली तरी अजून ठसठसत राहणारा पराभव वाट्याला आला.
            अर्थात पानिपत ही एक हरलेली लढाई आहे - मराठे युद्ध हरले नाहीत. इतकंच काय, युद्ध हरला असं म्हणायचं असेल तर तो अब्दाली हरला. लढाईला एक राजकीय उद्दिष्ट असतं. अब्दालीचं उद्दिष्ट होतं मराठ्यांचा पराभव करून, हिंदुस्थानचा बादशहा म्हणून स्वत:चं राज्य स्थापन करणं. तो १४ जानेवारीची लढाई जिंकला. पण त्याची इतकी प्रचंड तबाही झाली की आपल्याला इथे स्थिरावता येणार नाही हे त्याला कळलं. व्यवहारचतुर सेनापतीप्रमाणे तो हाताशी उरलेलं सैन्य घेऊन अफगाणिस्तानात माघारी गेला. (भाऊंनी सांगितल्याप्रमाणे!) त्याचं राजकीय उद्दिष्ट सफल झालं नाही. याउलट मराठ्यांचं राजकीय उद्दिष्ट होतं पातशाहीचं रक्षण करून मराठ्यांचं प्रभुत्व कायम ठेवणं. १४ जानेवारी या दिवशीची लढाई मराठे हरले, तरी परत सावरले. माधवराव पेशव्यानं मराठी दौलत पानिपतच्या पराभवातून पुन्हा उभी केली. महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली मराठे १० वर्षांत पुन्हा दिल्लीत पोचले. आणि अनेक दोष, उणिवा (की ज्यांचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करायला हवा - कितीही वाईट वाटलं तरी) असून सुद्धा आणखी सुमारे अर्धं शतकभर भारताचं सार्वभौमत्व मराठ्यांनी तोलून धरलं.
            तरी पानिपतावरच्या पराभवाचा सल अजूनही कायम आहे. असायला हवा. पानिपताच्या पराभवाची लीगसीअजून संपलेली नाही. स्वतंत्र भारत आपल्या तेजानं तळपेल - पाकिस्तान (किंवा चीन ...) हा भारताला धोका उरणार नाही आणि समृद्ध, समतापूर्ण भारत नव्या जोमानं जगात उभा राहील, तेव्हा म्हणता येईल की पानिपतावरचा पराभव पुसून काढला. स्वातंत्र्यानंतर त्या दिशेनं बरीच वाटचाल झाली आहे. अजून बरीच करायची आहे.