Thursday, January 31, 2013

धोक्याची घंटा



आता तरी आंध्र प्रदेश सरकारनं ओवेसीच्या महाभयानक, हिंसक, घटनाविरोधी भाषणाबद्दल योग्य पाऊल उचललं आहे. देर से आये पर (अभी तक तो) दुरुस्त आए. ओवेसीविरुद्ध पुरेशी गंभीर कलमं लावण्यात आली आहेत : देशाविरुद्ध युद्ध पुकारणं इ.... कोर्टानंही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दाखवली. फार सो गुड. आता ही कारवाई तिच्या नीट घटनात्मक टोकापर्यंत जायला हवी. भारताच्या फाळणीप्रमाणे भयानक रक्‍तपात टाळून विकासाची कहाणी चालू ठेवायची असेल तर हेच उत्तर आहे : घटनात्मक यंत्रणेनं आपलं कर्तव्य चोखपणे बजावणं.
    आमदार ओवेसीचं हे भाषण आंध्रमधल्या आदिलाबाद जिल्ह्यातल्या निर्मल या ठिकाणी २२ डिसेंबर २०१२ ला झालं. युट्यूब इत्यादी सोशल मिडिया आणि काही वृत्तपत्रांनी भयानक मजकूर समाजासमोर आणेपर्यंत पंधरा दिवस उलटून गेले होते. स्थानिक पोलिस किंवा आंध्र सरकारनं या भाषणाची दखलसुद्धा घेतलेली नव्हती. कारवाई करणं तर दूरच.
    ...आपण सगळ्यांनीच ओवेसीच्या भाषणाकडे गांभीर्यानं बघायला हवं. ‘१५ मिनिटांसाठी पोलिस दूर करा, २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना खतम करतील’ हे आत्तापर्यंत पेपरमध्ये आलेलं वाक्य फक्‍त हिमनगाचं टोक आहे. आमदार ओवेसी मार्च १९९३ मधल्या दाऊद -ISI नं घडवून आणलेल्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकांचं समर्थन करतो, बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ ला पाडल्यामुळे ते घडले - असं अनेक स्वयंघोषित पुरोगामी सेक्युलरवाद्यांप्रमाणे - तो म्हणतो. हे वस्तुनिष्ठरित्या सुद्धा चूक आहे. मार्च १९९३ मधल्या मुंबई बॉम्बस्फोटांचा कट ऑक्टोबर १९९२ मध्ये - बाबरी मशीद पाडण्याच्या २ महिने आधी शिजला. त्यासाठीचं RDX रायगड जिल्ह्यातल्या (की ज्याचा नंतर, १९९४ मध्ये मी कलेक्टर होतो) शेखाडी आणि दिवेआगार गावांमध्ये उतरवलं गेलं, ऑक्टोबर १९९२ मध्ये. पण ओवेसीला फॅक्ट्‍‍स्‌शी घेणं-देणं नाही, तर मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष (म्हणजे, ती एक प्रतिक्रिया होती!) समर्थन हे देशद्रोही कृत्य आहे, हे ओवीसेच्या गावी कुठून असणार.
    ओवेसी म्हणतो मी सेक्युलर वगैरे नाही, ‘मैं तो सिर्फ मुसलमान परस्त हूँ’. तो अजमल कसाबची बाजू घेतो, घुसखोर बांगला देशी मुसलमानांची बाजू घेतो. तो केवळ संघ-भाजप-विहिंप इ... संघटना आणि मोदी-अडवाणी इ... नेत्यांविरुद्ध बोलतो असं नव्हे (ते तर काय दिग्विजय सिंह, मनीष तिवारी, कपिल सिब्बल, आणि आता अनुपस्थितीनं आठवणारे चारित्र्यवान अभिषेक मनु सिंघवी वगैरेंचं घटनात्मक कर्तव्य आहे) ओवेसी सरकार, भारत, भारतीय संस्कृती, लोकशाही, राज्यघटना  या विरुद्ध बोलतो. तेही अत्यंत तुच्छ्तापूर्ण, शिवराळ भाषेत. ’अरे हम ऐसे नही जायेंगे तो साथ में ताजमहल, कुतुब मीनार, लाल किला... सब को लेके जाएंगे. तो बचेगा क्या, तुम्हारी वो अजंता-एलोरा की नंगी औरते?’ हे त्याचं इस्लाम-पूर्व भारतीय संस्कृतीचं आकलन आहे. तो सरसकट सर्व हिंदू-बौद्ध-जैन-शीख समाज, धर्म, देवदेवता, प्रथा यांच्यावर गलिच्छ भाषेत तुच्छ्तापूर्ण टीका करतो. राम, कौसल्यामाता, गोमात, दहनविधी सर्व हिंदू पद्धतींची नीच पातळीवर जाऊन  संभवना करतो. ’कौशल्या, राम की माँ, यहाँ गई, वहाँ गई और जाने कहाँ कहाँ गई’ - हे रामाच्या जन्माबाबत विधान.  ‘अरे हमें अपने वतन से इतना मुहब्बत है कि हम मरते भी है तो जमीन के दो गज नीचे दफनाए जाते है, तुम जलकर खाक हो जाते हो’ हे दफन दहन अंत्यक्रियेचं अभ्यासपूर्ण विश्‍लेषण. तर ‘ये अपनी माता बेचते है, अरे हम नही खरीदेंगे तो ये खुद चले आएंगे कि अकबर भाई खरीद लो हमारी माता को.... वैसे तुम माता कहते हो इसलिये हमने कहा, नहीं तो हमें तो बडा मजा आता है गोमांस खाने में’ हे चेकाळलेलं कुक्‌-बुक्‌ गायीबाबत. ’अभी तो मेरे हाथ में माईक है, कल न जाने क्या हो.... तो ऐसी तबाही मचेगी...’ ही प्रचंड हिंसाचाराची पूर्वसूचना. ’मुझे फोन आता है, अकबर भाई ऐसा हुआ, वैसा हुआ. ऐसा फोन क्यूं नही आता कि अकबर भाई ऐसा हुआ तो मैं ने ऐसा किया, अब आगे तुम संभालो....’ हे कायदा हातात घ्यायला दिलेलं प्रोत्साहन.
    चेकाळलेल्या हिंसक सुरात त्याचं भाषण चालूच राहतं. पण हे एका अतिरेकी व्यक्‍तीनं अंगात आल्यावर तोडलेले तारे नाहीत. हा हैद्राबादमधून निवडून आलेला आमदार आहे. त्याचा भाऊ लोकसभेत निवडून आलेला खासदार आहे - म्हणजे त्याच्या या शिवराळ, हिंसक वल्गनांना जनाधार आहे. ऐकणारा समाज सुद्धा वाक्या-वाक्याला ‘अल्ला हो अकबर’ चा जल्लोष करतोय. या भाषणाचं व्हिडिओ चित्रीकरण होतंय हे ओवेसीला माहीत आहे. नंतर या व्हिडिओ फिती मोठ्या प्रमाणात वितरित होणार आहेत, हे लक्षात घेऊनच केलेलं भाषण आहे हे. बाबरी मशीद केसमधल्या All India Muslim Law Board (AIMPLB) - की ज्यांची केस अलाहाबाद उच्च न्यायालयानं ‘खारिज’ केलीय - त्या AIMPLB चे वकील जफरसाब जिलानी व्यासपीठावर  बसलेले आहेत . त्यांना माहीतीय की अलाहाबाद उच्च न्यायालयानं एक निकाल दिलाय आणि बाब आता सर्वोच्च न्यायालयात ‘न्यायप्रविष्ट’ आहे. जेव्हा ओवेसी म्हणतो ’बाबरी मस्जिद फिर वहीं बनेगी.... यह हमारा वतन है, हमारा वतन था, हमारा वतन रहेगा’ तेव्हा कोणत्या ‘वतन’ बद्दल बोलतोय हा?
    ओवेसीनं म्हणणं की १५ मिनिटांसाठी पोलीस हटवा, मसग बघा काय होतं, आणि ११ ऑक्टोबर २०१२ ला मुंबई, आता जानेवारी २०१३ धुळ्यात नियोजनपूर्वक पूर्वतयारीनिशी उसळलेल्या दंगलींमध्ये पध्दतशीरपणे पोलिसांवरच अ‍ॅ‌‌‌‍टॅक्‌ होणं हे नुसते योगायोग नाहीत. आता धुळ्यात उसळलेल्या दंगलीमागे ओवेसीचं हे भाषण असल्याचं दिसून आलंय. अन्‌ ही तर फक्‍त झलक आहे. माझं तर म्हणणं  आहे की करेक्ट त्याच वेळी काश्मीरमध्ये २९ बलुच रेजिमेंटनं घुसखोरी करून दोन भारतीय जवानांची मुंडकी तोडणं हा सुध्दा केवळ योगायोग समजता येणार नाही. ही सर्व पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारतात घडवून आणण्याच्या रक्‍तपाताची ‘पायलट्‍’ चाचणी आहे, ‘सायरन्‌’ आहे.
    महंमद अली जिनांनी ‘१६ ऑगस्ट १९४६ ‘हा ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन डे’ म्हणून जाहीर केला. तेव्हाच त्यांना इंडियन पीनल कोड खाली अटक व्हायला हवी होती. पण ‘फोडा आणि राज्य’ करणारं ब्रिटिश सरकार जिनांच्या बाजूनं होतं. भारताच्या रक्त्ताळलेल्या स्वातंत्र्यानं तेंव्हा भयानक किंमत मोजली होती. ओवेसीच्या भाषणात जिनांच्या भाषणाचे प्रतिध्वनी आहेत.

1 comment:

  1. Very true sir...What would be the remedy for the situation according to u...Already there are 25 cr.muslims most of them r highly backward and blind followers of islamic mullas,maulavis,politicians who r leading thm towards wrong path...India cannot afford another separation...

    ReplyDelete