tag:blogger.com,1999:blog-4567473980053527036.post2693855230695850709..comments2023-10-14T19:10:02.125+05:30Comments on Avinash Dharmadhikari's Blog: ‘आप’चा अन्वयार्थUnknownnoreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4567473980053527036.post-25630077928550370022014-02-17T18:02:09.717+05:302014-02-17T18:02:09.717+05:30१८५७ च्या स्वतन्त्रयुधात आणि आजच्या आम आदमी पार्टी...१८५७ च्या स्वतन्त्रयुधात आणि आजच्या आम आदमी पार्टीच्या वागण्या बोलण्यात साम्य म्हणजे दोन्ही स्वतन्त्रयुधेच आहेत आणि दोन्ही लोकांवर अन्याय करणाऱ्या मुठभर सत्तेविरूद्ध ( सध्या आलटून पालटून ) आहेत . दोन्ही ठिकाणी जनता निकोप वातावरण मागत आहे ( तेंव्हा दडपशाहीमुक्त आणि आज भ्रष्टाचारमुक्त ) .<br />आणि फरक म्हणजे १८५७ ला जनतेकडे 'शस्र ' हे एकमेव शस्र होते . आज विचार , मत , एकी अशी आधुनिक शस्रे आहेत . भूतकाळात नेतृत्वाचा अभाव दिसून आला आज तो जाणवत नाही . तेंव्हा सुशिक्षित लोकांनी दूर राहणे पसंद केले आज परिस्तिति बर्यापैकी विरुद्ध आहे. मात्र कळस म्हणजे उठाव दडपण्याची सरकारी पद्धत तीच राहिली . क्रूर बिमोड ( शक्य त्या सर्व मार्गांनी )!<br /> आणि आजही काही लोकांना (कॉंग्रेस आणि भाजपचे एजंट ) सामान्य माणसाकडे सत्ता न देण्याची प्रवृत्ती दाखविल्याशिवाय चैन पडत नाही . असो . मात्र सध्या निघणारे तात्पर्य देखील त्यावेळेस सारखे असणार आहे ते म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर होणारी वैचारिक जागृती . (आम आदमी पार्टीला यश मिळो अगर न मिळो !!!) . Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4567473980053527036.post-55682021820019820652014-01-25T20:19:36.481+05:302014-01-25T20:19:36.481+05:30एकतर 'स्वच्छ' राजकारण वगैरे काहीही नसत अस ...एकतर 'स्वच्छ' राजकारण वगैरे काहीही नसत अस माझ स्पष्ट मत आहे.राजकारण हा एक अर्थकारणाचा खेळ आहे.जगातील सर्व बड्या महासत्ता अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या उर्जासाठ्यावर नियंत्रण मिळवायला कोणत्याही थराला जातात.तेव्हा भारतीय लोकांनी उगाच साधनशुचिता, संस्कृती वगैरे वगैरे दांभिक ढोल बडवायच थांबवून अर्थ आणि उर्जा आंधळेपणा आधी सोडावा.केजरीवाल वगैरे तथाकथित कंपू म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली राजकीय पाचपोच नसलेली पात्र आहेत.ज्यांना एवढी सोन्यासारखी संधी मिळूनही उत्तम शासन करता आले नाही त्या केजरीवाल आणि कंपूने मोठ्या बढाया मारण सोडाव.बर ज्यांच्या खांद्यावर बसून मोठे झाले त्या अण्णांना केव्हाच सोडचिट्ठी दिली.मिडिया आणि लोकांच्या मनातील तात्कालिक उद्रेक याचा दुहेरी फायदा उठवण्यापालीकडे केजरीवालांच कर्तुत्व काय ? व्यवस्थेला आव्हान देणारा प्रत्येक जण लोकांना आजपर्यंत हिरोच वाटत आलाय.त्यापेक्षा अस्तिवात असलेल्या व्यवस्थेला राबवण अधिक कठीण.आता काही तथाकथित स्वयंघोषित केजरीवाल आदींना स्वतःच्या स्वच्छ वगैरे प्रतिमेचा टेंभा मिरवण्यापलीकडे दुसरा कशातही रस नाही.पण चीन सारखे कावेबाज धूर्त राष्ट्र मध्यपूर्वेपासून ते अगदी आफ्रिका लाटिन अमेरिका खंड असे पाय पसरत असताना 'स्वच्छ' राजकारण वगैरे टाकाऊ कल्पनांची संभावना कचऱ्याच्या टोपलीत करून निरंकुशपणे आर्थिक सुबत्ता आणि व्यवहारी परराष्ट्र धोरण याचा पाठपुरावा भारताने करावा.भारत इतका दळीद्री आहे की त्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात काडीचीही किंमत नाही हे देवयानी प्रकरण, चीनची घुसखोरी, ब्रिक राष्ट्रांतील चीनची वाढती ताकद, ऊर्जेबाबत जगभर मागावी लागणारी भीक, मनमोहन आदींची अर्थान्धळी धोरण अशा अनेक गोष्टींतून वारंवार सिद्ध झालय.तेव्हा उठसुठ महासत्ता म्हणून स्वतःच पाठ थोपटून घेण्यापेक्षा भारताने आर्थिक सुबत्ता प्राप्त करावी आणि मग संस्कृती वगैरे बढाया माराव्यात.केजरीवाल वगैरे कंपू अगदी सत्तेत आले तरी काहीही बदल घडवू शकत नाहीत.हेकेखोरपणा, कालबाह्य आर्थिक तत्वज्ञान, स्वच्छता आणि साधन शुचितेचा अतिरेक, आपल तेच खर करण्याची आणि इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती ही 'आप'ने वारंवार दाखवली आहे.तेव्हा त्यांच्यामागे आंधळेपणाने धावणाऱ्या मध्यमवर्गाने हे लक्षात घ्यायला हरकत नाही.भ्रष्टाचार वगैरे फारच टुकार मुद्दे आहेत.आधीच कैक वेगवेगळ्या प्रकारच्या अंतर्गत संस्था असताना 'लोकपाल' वगैरे आणून नक्की काय साध्य झाल तेही चळवळी वगैरे करणाऱ्या लोकांनी सांगाव.उठसुठ उपोषण, धरणे धरून व्यवस्था वेठीस धरून काय ठोस साध्य होत कोणास ठाऊक ?बर असे अडचणीत आणणारे प्रश्न चळवळी करणाऱ्या लोकांना विचारले की त्यांची पंचाईत होते.मग ते आपल्याला देशद्रोही किंवा स्थितिवादी ठरवून मोकळे होतात. त्यापेक्षा शांतपणे आपल काम व्यवस्थित करणारे उद्योगपती आणि अधिकारी काय वाईट ? असो.Anonymousnoreply@blogger.com