Wednesday, January 28, 2015

कार्यकर्ता अधिकारी – भाग 7

कार्यकर्ता अधिकारी – भाग 7
तसा एकूण प्रशिक्षण कालावधी आणि त्यातही मसुरीचे दिवस मी भरपूर ‘एन्जॉय’ केलेत्यावेळी आमच्या बॅचच्या थोडं आधीअ‍ॅकॅडमीतच्या जुन्या शैलीतल्या लाकडी इमारती आगीत भस्मसात झाल्या होत्यात्यामुळे सगळ्याच व्यवस्थांमध्ये एक तात्पुरतेपणा होताअभ्यास विषयांची मुख्य मार्गदर्शन सत्रं ‘सरदार पटेल हॉल’ (SPH) मध्ये व्हायची - तिथे लोखंडीफोल्डिंगच्या बर्याच गंजलेल्या खुर्च्या होत्या - पण समोर चाललेल्या एकाहून एक सखोल सत्रांमुळे गंजलेल्या खुर्च्यांचा विसर पडायचा. (खुर्च्यांना गंज चढू नये म्हणून काळजी करतोयस तसा मानालाही गंज चढू नये म्हणून काळजी कर हो शाम!)
लायब्ररी मस्त होतीमी भरपूर वाचून घेतलंबर्यापैकी जिम होतीमाझा त्यावेळी चालू असलेला व्यायाम नियमित चालू राहिला.मी भरपूर टेनिस आणि स्क्वॉश खेळून घेतलंहॉर्स रायडिंगरायफल शूटिंग या ‘ऐच्छिक’ बाबी होत्या - पण अर्थातच मी त्या शिकून घेतल्याहॉर्स रायडिंगच्या ‘ट्रॉट’, ‘कँटर’, ‘गॅलपिंग’... या सगळ्या पायर्या पार केल्या. (मजा तर आलीचपुढे रायगडचा कलेक्टर असताना त्याचा उपयोग पण झाला.) मसुरी परिसरातल्या ‘केम्प्टी फॉल्स्पासून हरिद्वार-ऋषिकेशसकट हिमालय परिसरातसुट्ट्यांच्या दिवशी भरपूर भटकंती केलीअ‍ॅकॅडमीत चांगला ‘फिल्म क्लब’ - आणि दुनियाभरच्या विविध भाषांमधल्या उत्तमोत्तम चित्रपटांचा चांगला संग्रह होता - समग्र सत्यजीत रे - त्यांची ‘पथेर पांचाली’ सहित ‘अपु ट्रिलॉजी’ - शहरी शोषणाचं पिळवटून टाकणारं चित्रण करणारा ‘जनारण्य’... हे मी अ‍ॅकॅडमीत पाहिलेत्यावरची पुस्तकं वाचलीजाणकारांकडून भाष्य ऐकलं,त्यांच्याशी चर्चा केलीसार्वकालिक श्रेष्ठ असा जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावाचा सार्वकालिक श्रेष्ठ ‘राशोमान’, हॉलिवुडच्यामॅग्निफिसंट सेव्हनचा मूळ जपानी चित्रपट ‘सेव्हन सामुराई’ - असे खूप काही - चित्रपटविषयककलाविषयक जाणिवा प्रगल्भ व्हायला मदत झाली.
प्रशिक्षण काळात अभ्यास करून काही पेपर्स सादर करायचे होतेमी IAS होण्यापूर्वी ‘शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव’ मागणार्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होतोम्हणून 1979-80 मध्ये कांद्याच्या भावावरून झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं लादलेल्या 3 रुक्विंटलच्या जागी कांद्याच्या शेतकर्याला 70 रुक्विंटल भाव मिळाला होता - त्याचे चाकण परिसरातल्या शेतकर्यावर झालेले परिणाम - यावर मी अभ्यास करून पेपर सादर केला होताएक वर्ष कांद्याला भाव मिळाल्यामुळे शेतकर्याच्या हातात जास्त पैसा आलातो शेतकर्यानं शेती-तंत्रज्ञान सुधारायला वापरला - त्यामुळे उत्पादन आणखी वाढलं - असं माझं ‘फाईंडिंग’ होतं. ‘शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव’ मिळाल्यास शहरी औद्योगिक क्षेत्राकडून शेती - ग्रामीण क्षेत्राचं होणारं शोषण थांबलंशेती - ग्रामीण क्षेत्राची क्रमश: ‘दरिद्रीकरणाची’ प्रक्रिया थांबेल - ग्रामीण भागात क्रयशक्ती निर्माण होईलत्यामुळे भांडवल निर्मितीची प्रक्रिया सुरू होऊन - ग्रामीण भागात नवे उद्योगत्यातून रोजगाराच्या नव्या संधी - परिणामी आणखी क्रयशक्ती आणि भांडवल निर्मिती - असं विकासाचं चक्र सुरू होईल... असं सर्व आम्ही शेतकरी आंदोलनात सांगत होतो - तेच चाकण परिसराच्या माझ्या अभ्यासात दिसून आलं.
असाच पेपर मी ‘ड्रायलँड फार्मिंग’ विषयावर तयार केला होतादुष्काळप्रवणपाणी टंचाईग्रस्त भागातपाण्याची बचत करत शेती कशी करता येईल यावरचा तो पेपर होतापुढे प्रशासनातल्या सर्व वर्षांमध्ये आणि आजही तो अभ्यास कामी येतो.
* * *
IAS अधिकार्याच्या प्रशिक्षणाचा 2 वर्षांचा कालावधी अतिशय सुनियोजित आहे : साडेतीन-चार वर्षांच्या ‘फाउंडेशन कोर्सनंतर वेगवेगळ्या ‘अ‍ॅटॅचमेंट्स्’ आहेतअधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळण्यापूर्वी राष्ट्रीय जीवनाच्या वेगवेगळ्या संस्था तुम्ही जवळून पाहाव्यात अशी त्यामागे दृष्टी आहे.
त्यानुसार मला डिसेंबरच्या ऐन बर्फाळ कडाक्याच्या थंडीत काश्मिर मध्येभारतीय लष्कराच्या 10th Infantry Division च्या,ब्रिगेड 1/8 GR (गुरखा रेजिमेंटबरोबर 3 आठवडे ‘आर्मी अ‍ॅटॅचमेंट’ करण्याची संधी मिळालीगोरखालँड आंदोलनाचं नेतृत्व करणारे सुभाष घीशिंग 1/8 GR मध्ये होतेभारताचे कर्तबगार सरसेनापतीफील्ड मार्शल माणेकशा 2/8 GR मध्ये होतेमी प्रशिक्षण घेताना 1/8 GR ब्रिगेड 161 चा घटक होतोCo-Commanding Officer होते लोकनील टेंबे - आणि लष्कराच्या भाषेत2IC सेकंड इन कमांड - मेजर परशुराम नावाचा रुबाबदारदिलदार मल्याळी अधिकारीसेवेतून राजीनामा दिल्यानंतर 1999 च्या जून-जुलैमध्ये झालेल्या कारगिल युद्धातही मी भारतीय सैन्याबरोबर द्रास-कारगिल भागात होतोती व्यवस्था लावून देण्यात पुन्हा तेच होतेश्रीनगरमधल्या ‘बटवारा गेट’ या भागात भारतीय लष्कराचा तळ आहे - तिथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुढे मेजर परशुराम मारले गेलेत्यांनी दहशतवाद्यांना मशीनगन्स् घेऊन घुसताना पाहिलंमेजर परशुराम रिसेप्शन ऑफिसमध्ये होतेत्यांनी आपल्या लष्करी तळाला धोक्याचा इशारा दिलाइतर सहकार्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलंदहशतवाद्यांचा हल्ला स्वत:च्या अंगावर घेतलाते भारतासाठी शहीद झाले. 1986 साली 3 आठवडे त्यांच्या दयामाया न बाळगणार्या शिस्तीची मला मजा आली होती.
हिमालयातला एक ट्रेक करायचा असतोतो मी अवघडातला अवघड असा एक ट्रेक म्हणून ‘पिंडारी ग्लेशियरचा ट्रेक केला -हिमालयातले चालण्याचे 110 कि.मी. - आणि समुद्रसपाटीपासून 15 हजार फुटांवर... आणखी धमाल.
अ‍ॅकॅडमीत एकेका प्रांताचा ‘डे’ साजरा व्हायचा - तेव्हा त्या त्या प्रांताची वैशिष्ट्यं सादर करायची असतातत्यावेळी मी ढोल-ताशा-झांज (आणि तोंड!) भरपूर वाजवून घेतलं.
SPH मध्ये ‘विविध गुणदर्शन’ व्हायचंत्यात मी लिहिलेली ‘संघर्ष’ नावाची मूळ मराठी एकांकिका - हिंदी भाषांतर करून सादर केली. (त्या काळी मी स्टेजवर सुद्धा नाटकं करायचो!) दोनच पात्रं असलेलं हे नाटक - भोवतीच्या परिस्थितीबाबत अत्यंत संवेदनशील असलेला एकव्यावहारिक जगतात तो ‘वेडा’ ठरवला जातो - आणि त्याचं ‘वेड’ समजणारापण त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर - अशी दोनच पात्रंडॉक्टरची भूमिका केली होती IAS मधला सहकारी - डॉ.सुहेल अख्तर यानंतो मध्यप्रदेशातला होतात्याला सिक्किम केडर मिळालं होतं (‘वेड्याचा रोल कुणी केला हे काय वेगळं सांगायला हवं का?!)
त्यावेळी टी.व्हीवर - एकच राष्ट्रीय दूरदर्शन - DD चॅनेल होता - अजून केबल टी.व्ही.ची रेलचेल आली नव्हतीतेव्हा दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ चालू होतं - त्यापायी देशाला वेड लागलेलं होतं. (थोडे मूठभर ‘बुद्धिवादीसोडता रामायण-महाभारताचं देशाला हजारो वर्षं वेड लागलेलं आहे - जगाला सुद्धा.) तर दर रविवारी सकाळी देशभरचे रस्ते सुनसान असायचेलोक स्नान करून गंधटिळा लावूनचपला-बूट न घालता किंवा काढून - टी.व्ही.समोर - शिस्तीत वेळेपूर्वी 5मिनिटं आधीच येऊन बसायचे - तिथे भारत देश वक्तशीरपणा पाळतोलोक टी.व्ही.ला कुंकू लावायचेनारळ वाढवायचेहार घालायचेमालिकेत काम करणार्यानं ‘ड्रिंक्स्’ घेणं बंद केलं होतं - लोकही त्या अभिनेत्यांनाच राम आणि सीता समजून त्यांच्या पाया पडायचेपुढे रामाचं काम केलेला अरुण गोविल काँग्रेसमध्ये गेला आणि सीतेचं काम करणारी दीपिका चिखलिया आणि रावण - अरविंद त्रिवेदी भाजप मध्ये!
आम्ही पण न चुकता अॅकॅडमीमध्ये रविवारी सकाळी 9 म्हणजे 8.55 ला स्नान करूनचपला-बूट न घालता बसायचो.
आमच्याबरोबर असाच न चुकता सुहेल अख्तरही असायचा.
मित्रामित्रांमध्ये गंमत चालते (leg pulling) तसा मी एका रविवारी रामायणाचा ‘एपिसोड’ चालू असताना मधल्या ‘ब्रेकमध्ये सुहेल अख्तरला म्हणालो, ‘यार तू यह क्या कर रहा हैहर इतवार को हमारे साथ रामायण देखता है - तेरी मजहब वाले तेरे को मजहब से निकाल देंगे ना!’
तर एकदम गंभीर होऊन तो म्हणाला, ‘ऐसा क्यों कह रहे हो अविनाशरामायण क्या मेरी भी विरासत नहीं है?’ अनेक धर्मांधांना हे समजलं तर ‘भारत’ समर्थ होईल.
(त्या अख्तर नावातच काहीतरी जादू आहे - आठवा - जावेदफरहान नावाचे अख्तर.)

Saturday, January 17, 2015

पीके ते पॅरिस : पेशावरमार्गे

पीके.
इतका इनोदी काल्पनिक (कल्पक), हास्यास्पद (हसवणारा), शिणुमा आहे रावकाय सांगू तुम्हाला!
काही संकुचितबुरसटलेल्या विचाराच्या व्यक्तींना उगीचंच वाटतं की त्यात हिंदू धर्माचादेवदेवतांचा अपमान आहेवगैरे...
फारच सिरियसली घेतात बुवा हे लोक सिनेमात्यांना समजतच नाही की सिनेमा हे चार घटका मनोरंजनाचं साधन आहेमंदिरात जाताना जोडे काढून ठेवतात तसं सिनेमाला जाताना डोकं बाजूला ठेवून जायचं असतंफार तर्कशुद्ध प्रश्न विचारायचे नसतात,सुसंगती अपेक्षित धरायची नसते.
आता हा पीके.
कोण पीकेकुठला पीकेकाय पीकेकुठून आला - कोणत्या तरी परग्रहावरूनकोणता परग्रह - असलं काहीतरी काय विचारता रावकशाला आला - पुन्हा तेचहिंदू लोक कसे चुकीचे आहेतहिंदू कुटुंबात कसे चुकीचे संस्कार  केले  जातातहिंदू साधू  कसे ढोंगीलुटारू असतातहे दाखवून धर्मसंस्थापना करण्यासाठी आलानाहीतरी तुमच्या भगवद्गीतेत म्हटलेलंच आहे ना, ‘यदा यदाही  धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् ॥’ - धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा धर्माचं उत्थान घडवायलादुष्टांचा संहार करून साधू-सज्जनांचं रक्षण करायला मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो... म्हणून आला पीके.
तुमच्याच धर्मात कलियुगाची कल्पना मांडलीयकलियुग चालू आहे नाधर्माच्या नावाखाली ढोंगी साधू तुम्हाला लुटताय्त.उगीचंच गझनीच्या महम्मदाची आठवण करून देऊन खोटा इतिहास शिकवताय्तगझनीचा महम्मद खरा एक उदाररसिक,कर्तबगार साम्राज्यनिर्माता होता - हे कळण्यासाठी तुम्ही पंडित नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडियाची मूळ आवृत्ती वाचावला हवी.संकुचितबुरसटलेल्या विचारांची माणसं खोटं खोटंच सांगतात की गझनीच्या महम्मदानं 25 वर्षांत 17 स्वार्या केल्यापूर्वेला अयोध्येपासून दक्षिणेला सोरटी सोमनाथापर्यंत प्रचंड कत्तली केल्याप्रचंड सोनं-संपत्ती लुटून नेलीस्त्रियांना बाजारात दासी म्हणून विकलं - तो स्वतआपण मूर्तीपूजकांच्या मुंडक्यांची कशी रास रचली असं सांगतो - पण ते अतिरंजित आहेत्याच्याबरोबर संस्कृत पंडित अल् बेरुनी होतातो सांगतो की कोणतंही कारण  नसताना  निरपराध्यांची  कत्तल करून गझनीच्या महम्मदानं हिंदूंच्या मनात इस्लामबद्दल कायमचा तिरस्कार निर्माण करून ठेवलापण अल् बेरुनी विश्वासार्ह नाहीत्याचा दस्तावेज ग्राह्य मानता येणार नाहीत्याच्या एक हजार वर्षं नंतर झालेल्या थोर मार्क्सवादी इतिहासकार रोमिला थापर विश्वासार्ह आहेतत्यांनी अल् बेरुनीचे पुरावे-दाखले खोडून काढूनआपल्या ‘सोमनाथ’ या अभ्यासपूर्णनि:पक्षपाती ग्रंथात सिद्ध केलंय की सोमनाथाचं मंदीर उद्धस्त करणंसंपत्तीची लूटलक्षावधींची कत्तल... असं काही घडलं नसलं पाहिजेहे विसाव्या शतकातले बुरसटलेल्या विचारांचे काही मूठभर लोक जातीय तणाव निर्माण करूनस्वत:च्या सत्तेचीस्वार्थाची  पोळी भाजून घेण्यासाठी  याचा वापर करतात.रोमिला थापर यांनी सिद्ध करून दाखवलंय की भारतावर आक्रमण करणं कशी तत्कालीन आशियाई राजकारणातली गझनीच्या महम्मदाची अपरिहार्यता होतीती समजावून घेण्याऐवजी हे जातीयतावादी उगीचंच त्याच्यावर टीका करतातखरंतर गझनीचा महम्मद मागासलेल्या भारतीय संस्कृतीला जागं करून वैश्विकतेचं परिमाण देणारा ‘व्हिजनरी’ होतात्या नादात काही थोड्या लोकांचा नाश झाला तर त्याचं काय एवढंसर्व नवनिर्मिती विनाशातूनविनाशानंतरच होतेपण या मागासलेल्या विचारसरणीच्या लोकांना ‘डीकन्स्ट्रक्शन’ नावाची आधुनिक विचारप्रणाली माहीतच नसते ना!
हे सगळं पीके नंपीके मध्ये किती मार्मिकपणे दाखवलंयतो ढोंगी  तपस्वीजी कसा लोकांना भीती दाखवून ‘मंदीर निर्माणच्या नावाखाली लुटतोलोकांच्या श्रद्धांचा गैरफायदा घेतोहा ‘मंदीर निर्माणचा संदर्भ देऊन तर वर्तमानकालीन वास्तवावर काय अचूक बोट ठेवलंयभारतीय राज्यघटनेच्या चौकटीत हायकोर्टानं ‘मंदीर निर्माणाचा मुद्दा संवैधानिक दृष्ट्या ग्राह्य धरूनमंदीर निर्माणाच्या बाजूनं कौल दिलायआता मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहेपण चित्रपटाच्या कलात्मक गरजेसाठी तो मुद्दा महत्त्वाचा नाहीउच्च दर्जाच्या कला निर्मितीसाठी असे ‘आर्टिस्टिक कॉम्प्रमाईजेस्’ करायला परवानगी आहे!
आता तुम्ही म्हणालतो पीके नग्नच का येतो पृथ्वीवरपरग्रहावरची एवढी विकसित संस्कृतीतर त्यांना माहीत नाही का की पृथ्वीवरची माणसं - ‘आयटेम साँग’ आणि सनी लिओन सोडता सर्व जण कपडे घालतातअशी पाहणी करून मग ‘लँडिंग’ करत नाहीत काका परग्रहावरचा सगळा सरकारी कारभार सुद्धा पृथ्वीप्रमाणेच भोंगळ आहेशिवाय असं बिचार्या एकट्यानग्न पीके ला सोडूनत्यांचं यान निघून का जातंकेवढी अडचण झाली त्या बिचार्या पीके लाएक तर तो ‘रिमोट’ ठेवायला त्याला दुसरी जागा नाहीअडकवला गळ्यातआता इतकी सहज चोरी शक्य आहे म्हटल्यावर राजस्थानी चोएला मोह झाला नसता तरच नवल.पाकिस्तानात असं झालं नसतंपाकिस्तानात पीके चा रिमोट गळ्यात सुरक्षित राहिला असतातिथे कायदा-सुव्यवस्था-सलोख्याचा आदर्श आहेपण राजस्थानात चोरी होणारशेवटी तो ‘रिमोट’ म्हणजे हिमालयात शिवानं साक्षात्कार देऊन तपस्वीजीला दिलेलं ‘माणिक’ आहे - त्यावर ‘मंदीर निर्माणचा आदेश आहे - अशा ‘रिमोटला मागणी आहे तोवर ‘पुरवठाहोणारच कीअर्थशास्त्रातला हा अगदीच मूलभूत ‘मागणी-पुरवठ्याचा सिद्धांत आहे.
बरं त्या विकसित परग्रहावरच्या विवस्त्र पीके ला नुसते हातात हात घेतले की डायरेक्ट मेंदूतून संपूर्ण भाषा ग्रहण करता येते - तर हातात हात घ्यायला स्त्रीच का पाहिजेपुरुषाचा (उदासंजय दत्तचाहात हातात घेऊन भाषा शोषून घेता येणार नाही काभारीच प्रश्न विचारतात बुवा तुम्हीअहो तो पीके ‘गे’ नाहीत्याला भाषा शिकायला स्त्रीचाच हात हातात घ्यावा लागतोआधीच तो संजय दत्त तुरुंगात बसून बसूनपुन्हा ‘फर्लो’ मागून दमलायत्याला कुठे पीके च्या हातात हात घालायला सांगताय.
शिवाय तुम्हाला हिन्दी चित्रपटांचा एक ‘फंडा’ समजलेला नाहीहिन्दी चित्रपट म्हणजे - काही चांगले अपवाद सोडता - "Movies made by mentally retarded people, for mentally retarded people of mentally retarded people' (अब्राहम लिंकन झिंदाबाद).पीके नं तर आणखी प्रगती साधलीयपीके ‘मेंटल रिटार्डेशनपाशी न थांबता ‘मेंटल परव्हर्शन’ - मंदबुद्धीकडून विकृत बुद्धीकडे -जातोम्हणजे बुद्धीचा विकास झाला ना!
बरंपीके चा रिमोट चोरीला जातोत्याला कळतं की यांचे वेगवेगळे भगवान आहेतते तुमच्या मागण्या पूर्ण करतातअडचणी सोडवतातम्हणून पीके त्या त्या भगवंताची फी भरून ‘माझा रिमोट सापडवून दे’ म्हणून मागणी नोंदवतोथोड्या काळात कोणीच आपली मागणी पूर्ण केली नाही आणि घेतलेले पैसे पण परत केले नाहीत म्हणून तो मंदिराच्या परिसरात देवांची चित्रं आणून चिकटवतो, ‘लापता भगवान’ म्हणून -
तिथे सगळे गणपतीशिवलक्ष्मी कसे काय?
पीके नं मुस्लिमख्रिश्चन इ... देवांकडे मागणी नोंदवली नाही का?
लापता’ फक्त हिंदू देवदेवता?
असं काय  करता?  सर्व देव एकच नाहीत काहे तुमचं हिंदू तत्त्व ना? ‘एकं सद् विप्राबहुधा वदन्ति’ म्हणूनम्हणजेच हिंदू देवदेवता दाखवल्या की सगळे देव आलेच कीसगळे देव एकच आहेततो काही हिंदू देव वेगळामुस्लिमख्रिश्चन देव वेगळा नाहीतुमच्याच मनात हा संकुचितपणा दिसतोय.
शिवाय मुस्लिम देव आणि प्रेषिताचं चित्रं काढायचं नसतंइस्लामला ते मंजूर नाहीअसं चित्र काढलं तर काय घडतं पाहिलंत ना तुम्ही पॅरिसमध्ये नुकतंचमग कशाला आपण हिंसाचाराला प्रवृत्त करणारं वागायचंभारत देश सर्व धर्मांचा आदर करणारा देश आहे.
ओकेपण मग ख्रिश्चन देव तरी चिकटवायचा ‘लापता भगवानच्या यादीतक्रॉसमदर मेरीमॅडोना अँड द चाईल्ड किंवासिस्टिन चॅपेलच्या छतावरचा तो दाढीवाला बाबाचालतो ख्रिश्चनांनाशिवाय चित्रंकार्टूनचित्रपट (दा विंची कोडकाढला म्हणून ख्रिश्चन लोक लगेच दंगलीकत्तलीहातपायतोडरक्तपात वगैरे करत नाहीतलावायचं की चित्र ‘लापता भगवानम्हणून!
त्यानं ‘सेक्युलरवादाला बाधा पोचते.
विसरा तुमचा तो जुना पुराणाप्राचीन भारततो वैभवसंपन्न होताते सुवर्णयुग होतंहेही तुमच्याच डोक्यातलं प्रतिगामी खूळ आहे.
आधुनिक भारत सेक्युलर आहेइथे अल्पसंख्यांकांच्या हक्काचं रक्षण केलं जातं.
पण बहुसंख्यांकांच्या - म्हणजे हिंदूंच्या भावनांचं कायहिंदू धर्माचा आदर करण्याचं काय?
पुन्हा तुमचे तेच जातीयप्रतिगामीबुरसटलेले प्रश्साध्या व्याख्या समजलेल्या नाहीत तुम्हालाएक तर मुळात हिंदू धर्मात दोष - जातीव्यवस्थाहुंडा वगैरे - आहेतचमग ते दाखवले तर बिघडतं कुठेहिंदू धर्मात दोष आहेत असं नव्हेहिंदू धर्मच दोष आहे असं ठामपणे दाखवणं म्हणजे सेक्युलरवाद.
पुढे कॉलेजात परीक्षेला जाताना त्यांच्या अंधश्रद्धा दाखवायला पीके एक दगड उचलून झाडाला कुंकू किंवा शेंदूर लावून ठेवतो -म्हणजे पुन्हा हिंदूच देव - हेही साहजिक नाही काज्या देशात हिंदू सुमारे 85% आहेत - तिथे एकूण टिंगलटवाळीचा सुद्धा 85%वाटा हिंदूंचा असणं अगदी साहजिकच आहेम्हणून पीके म्हणतो ‘जो डरता है वो मंदिर जाता है’ - मस्जिद किंवा गिरिजाघर जाता हैनाही म्हटला. ‘ॐ जय जगदीश हरे’ कसं बेसूर म्हणतात ते दाखवलंय.
राहून राहून प्रश्न पडतो की मुळात पृथ्वीवर येताना पीके नग्न कात्या अर्थी त्याचा परग्रह कॅलिफोर्नियातल्या ‘सान फर्नांडो व्हॅली - (अमेरिकेच्या पोर्न इंडस्ट्रीचं केंद्रअसावापण चित्रपटात पीके नं कमालीच्या बुद्धीवादी तर्हेनं समजावून सांगितलंय!पक्ष्याकडे बोट दाखवून तो ‘जग्गीला समजावून सांगतोतो पाहा कसा नैसर्गिक अवस्थेत आहे - त्याला वाईट समजतो का आपण!काय सॉलिड बुद्धिमत्ता आहेपरग्रहावर पीके चा आयक्यू मायनस् 140 असला पाहिजे!
आत्तापर्यंतचा हा तुमचा सगळा भांडकुदळ वितंडवाद ऐकून ऐकून एक गोष्ट तर स्पष्टच दिसतेयकीया चित्रपटाचं खरं मोठेपण तुम्हाला समजलेलंच नाही.
सर्वसाधारणपणे चांगली कलाकृती समस्या मांडतेउत्तरं सांगत नाहीउत्तरांचा शोध-समाधान ही जबाबदारी त्या कलाकृतीचा आस्वाद घेणार्या रसिकाची असतेरसिकाला समस्येचं आत्मभान देणं एवढीच कलाकृतीची जबाबदारीविजय तेंडुलकरांसारखे सार्वकालिक श्रेष्ठ साहित्यिक तर स्पष्टच सांगतात की उत्तरं मांडणं हे कलाकाराचंकलाकृतीचं काम नाही.
पण पीके ते सुद्धा करतो.
पीके उत्तर मांडतो.
हिंदू कुटुंबत्यात मुलींवर झालेले चुकीचेबुरसटलेले द्वेषजातीयताधर्मांधता शिकवणारे संस्कार या सर्वांतून मुक्त होण्याचा उपाय काय?
पाकिस्तानसरफराज.
तुमच्या संकुचित मनाला लगेच आठवलंय की इंटरनेटवरचे भारताचे पत्ते जसे ‘डॉट इन्’ असतात तसे पाकिस्तानातले पत्ते ‘डॉट पीके’ असतात!
तुमच्या या जातीय स्मरणशक्तीचा निषेध केला पाहिजे.
जातीयच नाही तर धर्मांध सुद्धा.
पाकिस्तान केवळ मुस्लिम देश म्हणून तुम्ही त्याचा द्वेष करतापाकिस्तानच्या लक्षावधी मदरशांमधून भारत - हिंदू द्वेषाची शिकवण दिली जाते असा अपप्रचार करतापाकिस्तान म्हणजे अजमल कसाबझाकी-उर्-रहमान लाखवीहाफीज सईदमौलवी अझर मसूदलष्कर--तैयबाजमियत-उद्-दावाISIप्रॉक्सी वॉर... असा सगळा खोटा प्रचार करतापाकिस्तान म्हणजे ‘फेल्ड स्टेट’ - चोरीच्या मार्गानं अण्वस्त्रधारी देशती अण्वस्त्रं भारतावर टाकू असं गेल्या 10 वर्षांत तीनदा म्हटलेला देश.
किती द्वेषपूर्णधर्मांध आहात तुम्ही!
खरा पाकिस्तान किती चांगला देश आहे - शिवाय भारतीय - हिंदू मुलीच आपण होऊन पाकिस्तानी मुस्लिम मुलांच्या प्रेमात पडतातबाकी सगळा खोटाच प्रचार आहेबघा नासरफराज जग्गीशी चर्चमध्ये लग्न करायला तयार आहे - यातली मानवी एकात्मता समजत नाही का तुम्हालातर जग्गी गैरसमजामुळे सरफराज येण्यापूर्वीच चर्चमधून निघून जाते.
नंतर भारतीय चॅनेलवर ‘रिअॅलिटी शोमधून विदेशातल्या पाकिस्तानी दूतावासात नुसता फोन जातोत्यावर स्त्रीचा आवाज ऐकल्या क्षणी पाकिस्तानी दूतावासातली महिला किती आनंदित होतेलगेच ओळखतेआप जग्गी होभोवतीच्या सर्वांना आनंदानं सांगतेसुनो सुनोजग्गी का फोन आयाजग्गी का फोन आयाआता लाहोरला परतलेला सरफराज रोज 9 वाजता दूतासावात फोन करत असतो - कीमेरे लिए किसी लडकी का फोन आया थालगेच दूतावासातून जग्गीला सरफराजचा लाहोर नंबर जोडून दिला जातोकिती कार्यक्षमतुम्ही  खोटा  प्रचार  करता की पाकिस्तान भारताच्या काबूलमधल्या दूतावासावर हक्कानी नेटवर्कच्या द्वारा  दहशतवादी  हल्ला  घडवून  आणतोतुमचा द्वेषमूलक धर्मांध प्रचार आहे की पाकिस्तानी तालिबान पेशावरच्या शाळेवर हल्ला करून 200 पेक्षा जास्त मुलांची कत्तल करतोखरा पाकिस्तान पाहा किती प्रेमळ आहे!
भारतीय - विशेषतहिंदू स्त्रीच्या मुक्तीचा मार्ग?
पाकिस्तानी पती.
नाहीतरी 1947 नंतर पाकिस्तानातले हिंदू संपवून झालेहिंदू मुलींना  पळवून  नेऊनबलात्कार करूनसक्तीनं धर्मांतर करून त्यांचे मुसलमान मुलांशी निकाह लावून झालेतो पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहेकारण जगात कुठेही अन्य सर्वांना मानवाधिकार आहेतपण हिंदूंना मानवाधिकार नाहीतहिंदूंची बाजू घेणं म्हणजे जातीयतावादमग शेवटी पाकिस्तानातल्या हिंदू मुली संपल्याआता त्यांनी बघावं कुठेआहे ना आपला उदार भारतत्यातली जग्गी.
आपले साधूपुरुष सगळे कसे ढोंगी आहेतआजपर्यंत आपण जोपासलेली सगळी मूल्यं कशी चुकीची आहेत हे समजलेला जग्गीचा पिताआता तिचा सरफराजशी संबंध स्वीकारल्यावर कसा खूश होऊन पूर्वीप्रमाणेतिलाI am proud of youम्हणततोंडात बोटं घालून शिट्ट्या वाजवतो.
भारत-पाक संबंध सुरळीत करण्याचं कित्ती व्यावहारिक सोल्यूशन मांडलंय पीके नं!
शिवाय आता आपला दाऊद पाकिस्तानात आहेतरी बॉलिवुडशी त्याचे सांस्कृतिकआर्थिक संबंध आहेत.
मुघलांच्या जनानखान्यात आपल्या मुली वाढवण्याची आपली उदारसर्वसमावेशक इतिहास-परंपरा आहेच.