Monday, September 29, 2014

विधानसभेची वाट

 ...आणि आपण सगळेच
लेखांक १२७


विधानसभेची वाट 


सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य




पुढच्या किमान पाच वर्षांचं महाराष्ट्राचं भवितव्य, येत्या ३५ दिवसांत मतपेटीतून बाहेर पडेल.
चालू विधानसभेची मुदत ७/८ नोव्हेंबरला संपते. तेव्हा घटनात्मक दृष्ट्या त्यापूर्वी नवी विधानसभा गठित व्हायला हवी.
म्हणून एकूण मिळून, दिवाळीपूर्वीच सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. या अपेक्षेनुसार निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. १५ ऑक्टोबरला मतदान, १९ ऑक्टोबरला मतमोजणी.
शेवटाची सुरुवात झाली - (Biginning of the END)
कुणाच्या, हाच मुख्य प्रश्न आहे.

लोकसभेनंतर

१६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल आले. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचा पूर्वी कधीही झाला नव्हता, आणि आताही कुणाला वाटलं नव्हतं एवढा प्रचंड पराभव झाला. संपूर्ण राज्यातून काँग्रेसच्या वाट्याला आख्ख्या दोन जागा आल्या! तर राष्ट्रवादीचं रेकॉर्ड त्याच्या दुप्पट - म्हणजे, तब्बल चार जागांचं प्रस्थापित झालं.
आजपर्यंत राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अगदी १ मे  १९६० नंतर संयुक्त महाराष्ट्र समितीचं जबरदस्त आव्हान परतवून लावत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता स्थापन केली. पंचायत राज, सहकार चळवळ, औद्योगिकीकरण या माध्यमातून गाव पातळीपर्यंत त्यांनी काँग्रेसचा पाया पक्का केला, त्यानंतर वेळोवेळी राज्यात काँग्रेसला आव्हान उभं राहिलं – संयुक्त महाराष्ट्र समितीनंतर आधी शेतकरी कामगार पक्ष (एकेकाळी राज्यात काँग्रेसच्या सत्तेला शेकापनं आव्हान उभं केलं होतं हे आज ऐकायला सुद्धा गंमत वाटते), मग आणीबाणीनंतर जनता पक्ष (आणि शरद पवारांचं पुलोद सरकार), इंदिराजींच्या हत्येनंतरच्या काळात शरद जोशींची शेतकरी संघटना – आणि अजून चालू असलेला अध्याय - म्हणजे भाजप- शिवसेनेचं आव्हान. यापैकी सत्तेपर्यंत पोचू शकले, सेना-भाजप. पण एकदा मिळालेली सत्ता १९९५ मध्ये) टिकवता आली नाही - १९९९ मध्ये. आणि त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं राज्य सलग १५ वर्षं आहे.
यावेळच्या लोकसभेचं मतदान, म्हणजे UPA II च्या केवळ ५ वर्षांच्या कारभाराबाबतचा कौल नव्हता, तर UPA च्या १० वर्षांच्या कारभाराबाबतचा कौल होता. तशी येती विधानसभा निवडणूक म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गेल्या ५ वर्षांचा कारभार किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाबाबतचा कौल नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गेल्या १५ वर्षांच्या कारभाराबाबतचा कौल आहे.
या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीतला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव भयंकरच दारूण ठरतो. विधानसभेच्या २८८ पैकी २४७ मतदारसंघांत भाजप-सेनेची आघाडी होती. साक्षात बारामती मतदारसंघात सुद्धा मतमोजणीच्या एका टप्प्यात सुप्रिया सुळे मागे पडल्या होत्या - ही गोष्टच धक्कादायक होती. बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रातही विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी काँग्रेसराष्ट्रवादीच्या स्थानाला धक्का लावू शकलं नव्हतं, तिथे सुद्धा लोकसभेत दारूण पराभव झाला.

विधानसभेचा वेध

काळाची हाक तेव्हाच स्पष्ट होती. राज्यातली जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळली आहे. ‘अँटी-इन्कम्बन्सी’ फॅक्टर तर प्रभावी ठरतोच. पण जनता नुसती कंटाळून चालत नाही, विश्वासार्ह पर्याय समोर यावा लागतो. लोकसभेच्या वेळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप / रालोआनं प्रभावी पर्यायाबाबतची विश्वासार्हता मिळवली. लोकांनी भरभरून दान पदरात टाकलं. पण महाराष्ट्रात त्यानंतरच्या ५ महिन्यांत काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभव आणि भाजप-सेनेला विजय समोर दिसतोय म्हटल्यावर दोन्हींच्या प्रतिक्रिया ‘पॅनिक’च्या होत्या.
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनं सर्वस्वी घटनाबाह्य आणि देशाला घातक, अशा धार्मिक आधारावर राखीव जागा जाहीर केल्या. शंकराचे उपासक आणि संत बसवेश्वर गुरु असलेल्या लिंगायत समाजाला ‘अल्पसंख्याक’ ठरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करून ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ (आणि भवितव्यावर पेटता निखारा) ठेवलं. याउलट धनगर समाजाच्या योग्य मागणीचा वेळीच, सहानुभूतीपूर्वक विचार केला नाही. जनतेच्या खर्चानं वृत्तपत्रात पानपान भरून जाहिराती दिल्या, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी खजिन्याची जमेल तेवढी उधळपट्टी करून घेतली. आणि ‘टोल’सारख्या प्रश्नावर जनतेची लूट थांबवायला पाहिजे होती, ते मात्र केलं नाही.
याच्या उत्तरार्थ सेना-भाजप ची जबाबदारी बनत होती, लोकांसमोर ‘विकास आणि सुशासना’ची ‘व्हिजन’ ठेवण्याची. नरेंद्र मोदींनी आधी गुजरात, नंतर देशात यशस्वी रित्या राबवलेल्या ‘सब का साथ सब का विकास’चीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात करण्याची.
माझ्या मते, महाराष्ट्रात राज्याच्या स्थापनेच्या वेळी यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा महाराष्ट्राला ही दृष्टी दिली होती - विकास, सुशासन, ‘बेरजेचं राजकारण’- पुढे त्यांच्या राजकीय वारसदारांनी त्याचा भलताच अर्थ केला.
पण समोर निश्चितपणे सत्ता दिसते आहे म्हटल्यावर सेना-भाजपतलेही महत्त्वाकांक्षा आणि मतभेद उफाळून आले.
आणि मोदी लाटेच्या सपाट्यात सापडून राज ठाकरे आणि मनसे ची दिशा हरवून गेली, ती गेलीच. आता विधानसभा निवडणुकीत मनसे ची नेमकी‘पोलिटिकल स्पेस’ कोणती हे सांगणंच अशक्य झालंय. महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ मांडण्याच्या मुद्द्याला आता उशीर झालाय.

विस्कटलेलं राजकीय चित्र

गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्राचं सामाजिक-राजकीय चित्र अधिकाधिक विस्कटत गेलंय - म्हणण्यापेक्षा, संकुचित राजकीय स्वार्थावर डोळा ठेवून, ते मुद्दामच विस्कटवण्यात आलंय. जातीपातींच्या परिभाषेनं, परस्पर विद्वेषाच्या वृत्तीनं महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण कोंदून गेलंय. त्याचंच प्रतिबिंब राजकीय चित्रात दिसतंय.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा संसार कधीच सुरळीत नव्हता. सरकार चालवताना सतत कुरबुरी आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे उद्योग चालू होते. त्या नादात महाराष्ट्राचा विकास मार खात होता. तर सेना-भाजप तही सतत कुरबुरी आणि युती तोडून टाकण्याच्या गर्जना आलटून पालटून होतच होत्या.
आता वेगवेगळे राजकीय गट आणि पक्ष आहेत म्हटल्यावर, व्यावहारिक राजकारणात काही धक्काबुक्की चालणारच. पण महाराष्ट्रात ती प्रमाणाबाहेर जात चाललीय. त्या नादात राजकारणाला, मुळात, सत्तेव्यतिरिक्त, काही सेवेचा, विकासाचा अर्थ असतो, हे विसरल्यासारखं झालंय.
                                                                     * * *
आता राज्यातली राजकीय परिस्थिती तासा-तासाला बदलते आहे. पण एकूण मिळून उमेदवारी अर्ज भरणे आणि मागे घेणे - एवढं होईपर्यंत राजकीय खींचातानी (Brinkmanship) संपेलही. मग निवडणुकीय वापरण्याच्या राजकीय दृष्ट्या योग्य (politically correct) शब्दांचं ‘ऱ्हेटरिक’ सुरू होईल. वातावरण इतकं दूषित आणि संशयानं भरलंय की परस्पर पाडापाड्यांचे खेळही होतील. या नकारात्मकतेतून नवं सरकार बनेल. मला वाटतं काँग्रेसराष्ट्रवादीला मनोमन जाणीव आहे की आपलं सरकार येणं जवळजवळ अशक्य आहे. पण राज्यात चालू असलेल्या राड्यामुळे, तत्त्वत:, १९ ऑक्टोबरपर्यंत, सर्व शक्यता खुल्या आहेत.
बर्‍याच काळापूर्वी म्हणालो - ते आताच्या संदर्भात पुन्हा म्हणतो - ते म्हणण्याचा मला आनंद नाही, दु:खच आहे - पण दिसतंय असं की भारताचं भवितव्य उज्ज्वल आहे, महाराष्ट्राच्या भवितव्याची काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे. भारताचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यात महाराष्ट्र किती वाटा उचलणार, यापुढे आज तरी प्रश्नचिन्ह आहे.

Monday, September 22, 2014

‘इस्लामिक दहशतवादा’चा धोका



 ...आणि आपण सगळेच
लेखांक १२६

 इस्लामिक दहशतवादाचा धोका
    
सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य
     
 सुरक्षा व्यवस्थेला असलेल्या सर्वांत मोठ्या, गंभीर आणि घडू पाहणाऱ्या धोक्याला 'clear & present danger' म्हटलं जातं. इस्लामिक दहशतवाद हे पुणे, मुंबई, महाराष्ट्रासहित भारत आणि जगासाठी 'clear & present danger'  आहे. ISIS (Islamic State of Iraq & Syria/Shama : तुर्की-सिरिया प्रदेशाला नावशाम हे आहे) - काही वेळा या संघटनेचा उल्लेख ISIL होतो (Islamic State of Iraq & Levant -  लेव्हॉ हे सिरिया-लेबनान प्रदेशाचं बायबल कालीन नाव आहे)... तर अत्यंत भयानक हिंसक, क्रूर आणि धर्मांध ISIS ही ती संघटना, हा त्या इस्लामिक दहशतवादाचा सध्याचा सर्वांत आक्रमक आविष्कार आहे.
            आता वर्षअखेरीला अमेरिका अफगाणिस्तानातून माघारी जाणार, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष हमीद करझाईंचे दोन कालावधी पूर्ण होताय्‌त, म्हणून अफगाणिस्तानात विवादास्पद राष्ट्राध्यक्ष निवडणूक होते आहे. अफगाणिस्तानची परिस्थिती समजणाऱ्या कोणाच्याही लक्षात  येईल की तालिबान अमेरिका माघारी जाण्याच्या मुहूर्ताची वाट पाहात दबा धरून बसलेलं असणार.
            त्या तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचं आता सप्रमाण सिद्ध झालंय. पाकिस्तानचं सर्व अंतर्गत-लष्करी-परराष्ट्र धोरण भारताला शत्रूस्थानी ठेवतं. म्हणून चीनशी सार्वकालिक मैत्री आणि भारताविरोधात लढतानास्ट्रॅटेजिक डेप्थहवी म्हणून अफगाणिस्तानमध्ये भारताला प्रतिकूल राजवट - म्हणजे लोकशाही नाही, तालिबानची राजवट हवी. त्या तालिबानचं अल् कायदा आणि त्याचा बिन लादेननंतरचा प्रमुख अयमान-अल्-जवाहिरी यांना संरक्षण आहे. जवाहिरी तर पाकिस्तानात क्वेट्टा, पेशावर आणि वजिरीस्तान भागात असू शकतो. या आठवड्यात जवाहिरीनं भारतात अल् कायदाच्या शाखा सुरू झाल्याचं जाहीर केलं आणि भारतीय मुस्लिमांनाजिहादसाठी आवाहन केलं.
            खरं म्हणजे यात नवीन काही नाही. अल् कायदाची स्थापना करताना १९९६ मध्येच बिन लादेननं जाहीर केलं होतं की अमेरिका शत्रू क्र. आहे आणि त्यापाठोपाठ भारत शत्रू क्र. . जवाहिरीनं त्या घोषणेची उजळणी केली असं म्हणता येईल. काही जणांनी जवाहिरीच्या घोषणेचा अर्थ केला -  लक्ष वेधून घेण्यासाठीची सनसनाटी चाल. त्यांच्या मते बिन लादेननंतर अल् कायदाचे आर्थिक आधार आणि इस्लामिक जगतातला प्रभाव, दोन्ही घटत चालले आहेत. विशेषत: सिरिया, इराकमध्ये ISIS  नं जी तुफानी चाल करूनखिलाफत स्थापन केल्याची घोषणा केली, त्यामुळे अल् कायदा फिकी पडत चालली आहे. अल् कायदा आणि ISIS चं खिलाफत स्थापन करून जागतिक इस्लाम एका छताखाली आणण्याचं, जगावर इस्लामचं राज्य स्थापन करण्याचं उद्दिष्ट एकसमान आहे.
            भारतीय मुस्लिमांना जिहादचं आवाहन करणारी जवाहिरीची घोषणा नुसतीअॅकॅडेमिककिंवा एक लक्षवेधी चाल समजणं भारतासाठी (नेहमीप्रमाणे) बेसावध आणि आत्मघातकीपणाचं ठरेल. अल् कायदाला सहानुभूत घटक आत्ता सुद्धा भारतात आहेत. त्या घटकांनी स्वत:लाइंडियन मुजाहिदीन असं नाव घेतलंय. पुण्यातल्याजर्मन बेकरीपासून बुद्धगयेतल्या बॉम्बस्फोटांपर्यंतइंडियन मुजाहिदीनचा हात सिद्ध झालाय. यासीन भटकळ तर तुरुंगात आहे, पण चालू आठवड्यातइंडियन मुजाहिदीनच्या मूळ संस्थापकांपैकी एकएजाज शेख, पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यानंही भारतीय मुस्लिमांना जिहादचं आवाहन केलं होतं.
            प्रश्न नुसत्या आवाहनाचा नाहीये. अल् कायदा आणि तालिबानच काय, पार तिकडे इराकमध्ये ISIS कडून लढण्यात भारतीयमहाराष्ट्रातले तरुण सामील असल्याचं दिसून आलं. त्यातला एक तिथे मारला गेला. दुसऱ्यानं भारतीय मुस्लिमांना जिहाद करण्याचं आवाहन केलं. ISIS मध्ये सामील व्हायला निघालेली आणखी मुलं पोलिसांनी पकडली. आत्ता सुद्धा भारतात - महाराष्ट्रात ISIS चे तळ असल्याच्या वार्ता आहेत.
           
ISIS चं आक्रमण अलिकडच्या काळातल्या धर्मांध इस्लामिक अतिरेकाचा सर्वांत प्रभावी - अजूनपर्यंत यशस्वी - दिसणारा आविष्कार म्हणावा लागेल. मार्च २००३ मध्ये इराकमधल्या अमेरिकेच्या सद्दामविरोधी आक्रमणानंतर, ओबामानं, २००८ मधल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत दिलेल्या शब्दानुसार, इराकमधून क्रमाक्रमानं लष्कर कमी कमी करत माघारी नेलं (फक्त ५५००० लष्करी सल्लागार इराक मध्ये ठेवले!) ओबामाच्या धोरणानुसार अफगाणिस्तानवर लक्ष केंद्रित करायचं होतं. त्यानुसार त्यानं २००८ नंतर अफगाणिस्तानमधलं अमेरिकन सैन्य वाढवलं. त्याप्रीत्यर्थ ओबामाला नोबेल शांतता पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आता अफगाणिस्तानातही तालिबान, अल् कायदाच्या अतिरेकी शक्ती आवरता येत नाहीयेतकारण त्या शक्तींना पाकिस्तानचा सक्रीय पाठिंबा आहे. अमेरिकन पत्रकार कार्लोटा गाल हिनं तर अमेरिकेच्या अफगाणिस्तानातल्या कारवाईला आपल्या ग्रंथाच्या शीर्षकातच राँग एनिमी म्हटलंय. कार्लोटा गालच्या मते पाकिस्तान हाराईट एनिमी आहे. तेव्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून उभारून येणारा इस्लामिक दहशतवाद हा भारतासाठी 'clear & present danger' आहेच.
            तर तिकडे इराकमध्ये इस्लामिक शक्तींना सावरायला, संघटित होऊन बळ वाढवायला वेळ आणि संधी मिळाली असं दिसतंय. इराकमधल्या अल् कायदाचा प्रमुख होता अल् झरकावी. तो अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेला. पण २००३  मधल्या अमेरिकेच्या, आता एव्हाना सर्वस्वी असमर्थनीय म्हणून सिद्ध झालेल्या 'shock & awe' आक्रमणानं नव्या अतिरेकी शक्तींसाठी सुपीक पृष्ठभूमी तयार केली. त्यावर अचानक अज्ञातातून आल्यासारखा उगवून आलाअल् बगदादीहा तसा मूळ इराकी उद्योजक. पण अमेरिकेच्या इराक आक्रमणानंतर त्यानं आपली आर्थिक शक्ती इराक मधल्या सुन्नी शक्ती संघटित करण्यामागे लावली. २००३ नंतर अमेरिकेच्या मार्गदर्शनाखाली इराकसाठी लोकशाही राज्यघटना तयार करण्यात आली. ती राज्यघटना, त्यानंतरची निवडणूक - या प्रक्रियेशी इराकमधल्या शिया अरबांनी सहकार्य केलं, सुन्नी अरबांनी मुख्यत: बहिष्कार टाकला. इराकमधलं सरकार आणि पंतप्रधान मलिकी शियापंथीय होते. शेजारचा, पश्चिमेकडचा सिरिया - अध्यक्ष बशर असद - आणि पूर्वेकडचा इराण शियापंथीयच. शियापंथीय इराण आपला अणुबॉम्ब तयार करत आपला प्रभाव भूध्य समुद्रापर्यंत पोचवण्यात मग्न. म्हणून त्या इराणविरुद्ध निर्बंध -  आणि स्वत:च्या लोकांविरुद्धरासायनिक अस्त्रं वापरणाऱ्या सिरियाच्या असदविरुद्ध UN, अमेरिका, NATO कारवाई करेल, अशा शक्यता असताना, त्या मावळताना, अचानक अज्ञातातून आल्यासारखा वाटावा तसा ISIS चा उठाव झाला. ही जबरदस्त अशी सुन्नी प्रतिक्रिया होती.  सिरियाच्या आणि इराकच्या उत्तरेकडचा भाग जिंकून घेत ISIS नंइस्लामिक स्टेटची स्थापना केली. अल् बगदादीच्या नावाची घोषणाखलिफा म्हणून झाली. ISIS च्या अत्याचार, कत्तली, बलात्काराच्या कहाण्या भयानक अमानुष आहेत. त्याचे सर्वांत भीषण बळी ठरलेत, इराकच्या उत्तर भागातलेयेझिदी नावाचे अल्पसंख्यांक. त्यांना इस्लामचा स्वीकार करा किंवा मरा असा पर्याय देण्यात आला. पुरुषांच्या कत्तली करण्यात आल्या, स्त्रियांवर बलात्कार करून त्यांनासेक्स् स्लेव्हम्हणून डांबून ठेवण्यात आलं. ISIS च्या तावडीत भारतीय कामगार आणि नर्सेस् सापडल्या होत्या. भारतीय नर्सेस्ना सुखरूप सोडवून सन्मानानं परत आणता आलं हा भारताच्याडिप्लोसीचा विजयच म्हणावा लोगल. पण भविष्यकाळातल्या धोक्याच्या तुलनेत, हा अगदी छोटा विजय ठरतो.
            नायजेरियातली अतिरेकी इस्लामिक संघटना आहे बोको हराम. आता ही बोको हराम आणि ISIS, मुख्यत: मादक द्रव्यांच्या व्यापारातून भारतात हातपाय पसरत असल्याच्या वार्ता आहेत. त्यांनादाऊदच्या नेटवर्कच्या मागून पाकिस्तान-ISI आणि पाकी सैन्याचं सहकार्य, मार्गदर्शन आहे.
            अतिरेकी इस्लामिक शक्तींची एक पक्की श्रद्धा आहे की इस्लामी कालगणनेचं १५ वं शतक इस्लाम च्या जागतिक विजयाचं असणार आहे. आणि त्या विजयाची निर्णायक लढाईगझवा--हिंद- अफगाणिस्तानपासून गंगेच्या खोऱ्यापर्यंत लढली जाणार आहे. ISIS, खिलाफत ही त्याची सुरुवात आहे.
            सुदैवानं भारतीय उलेांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय की भारतीय मुस्लिमांनी अशा अतिरेकी आवाहनांना बळी पडता, भारतावर निष्ठा ठेवूनच आचरण करावं. इस्लामचे एक जागतिक अधिकारी समजले जाणारे, ‘देवबंदस्कूलचे मौलाना वहिदुद्दिन खान यांनी - ‘दारुल इस्लामविरुद्धदारुल हरब - अशा कोणत्याही हिंसक संघर्षात पडता भारतदारुल अमन (शांततेचा, भाईचाऱ्याचा प्रदेश) व्हावाअशी संकल्पना मांडलीय, भारतीय मुस्लिमांना तसं आवाहन केलंय.
            इस्लामिक दहशतवादाच्या 'clear & present danger' चं उत्तर यात आहे.