Thursday, July 24, 2014

दहशतवादाचा केंद्रबिंदू पाकिस्तान

...आणि आपण सगळेच
                 लेखांक १२०










       दहशतवादाचा केंद्रबिंदू पाकिस्तान 


        सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

         
पाकिस्तानी पत्रकार सलीम शहजाद यांचं पुस्तक ‘अल् काईदा ते तालिबान’. प्रत्येक भारतीयानं, प्रत्येक माणसानं हे काळजीपूर्वक वाचून सलीम शहजादला श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे. २ मे २०११ ला अमेरिकन मरीन्‍सीनी इस्लामाबादजवळच्या अबोटाबाद इथल्या घरावर हल्ला चढवून बिन लादेनचा खातमा केला. नंतर ISI नं सलीम शहजादला भेटायचा निरोप दिला होता. ४ मे ला त्याचं प्रेतच सापडलं.


स्वत: पाकिस्तानी पत्रकार असूनही पाकिस्तानी सैन्य, ISI, सत्ताधारी, इस्लामिक मूलतत्त्ववादी – लष्कर-ए-तैयबा, जमियत-उद्-दावा यांचा विरोध करायचा, तथाकथित ‘स्टेट’ अ‍ॅक्टर्स आणि‘नॉन-स्टेट’ अ‍ॅक्टर्स यांची मिलीभगत असल्याचं दाखवून द्यायचं, हे प्रचंड धैर्याचं कृत्य आहे. सलीम शहजादला तर प्राणांची किंमत मोजावी लागली. त्याला सलाम करावेत तेवढे कमी आहेत.पाकिस्तानच्या खाजगी क्षेत्रातला सर्वांत मोठा टीव्ही चॅनल म्हणजे ‘जीओ’– त्याचाही झुंजार पत्रकार हमीद मीर वर कराचीत जीवघेणा हल्ला झाला. त्याच्यामागे ISI असल्याचा अंदाज‘जीओ’नं व्यक्त केला. तर चॅनलला प्रचंड दंड झाला, चॅनल बंद पडायची वेळ आली, ‘जीओ’ला ISI वर पुराव्याअभावी आरोप केल्याबद्दल बिनशर्त क्षमा मागावी लागली. पाकिस्तानात प्रथमच लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या सरकारनं ५ वर्षं पूर्ण करून, वेळेत निवडणुका झाल्या – याचा अर्थ पाकिस्तानात लोकशाही स्थिरावू लागली – (तसं खरंच झालं तर ते चांगलंच ठरेल) आणि राजकीय व्यवस्थेवरची सैन्य, ISI, इस्लामिक मूलतत्त्ववादी यांची पकड कमी झाली – असं बोललं जायला लागलं. ते किती वरवरचं आहे हे हमीद मीर-जिओ प्रकरणांत दिसून येतं.असाच दुसरा पाकिस्तानी धाडसी पत्रकार म्हणजे अहमद रशीद. अहमद रशीद सौ साल जिओ, कारण तो अजून जिवंत कसा – याचं आश्चर्य वाटावं इतकं पाकिस्तानातलं वातावरण धोकादायक आहे. अहमद रशीदचं इस्लामिक दहशतवाद उघडा पाडणं परखड आहे. त्यानं आपल्या ‘तालिबान’, ‘जिहाद’, ‘पाकिस्तान : डीसेंट इन् टु केऑस’ या पुस्तकांमधून पाकिस्तान आणि मध्य आशिया (कझाकस्तान वगैरे पाच ‘स्तानं’) इस्लामिक मूलतत्त्ववाद कसा वाढतो आहे आणि त्याच्या मध्यभागी पाकिस्तानच आहे, पण इस्लामिक मूलतत्त्ववादाशी सोयरीक करण्यामुळेच पाकिस्तान कसा अराजकाकडे कोसळत चाललाय, हे मांडलंय.


महिला पत्रकार ग्रेचेन पीटर्सनं पाकिस्तान अफगाणिस्तानात  प्रवास, संशोधन करून मांडलंय की अफगाणिस्तानमधली अफूची शेती, त्यानंतर अंमली पदार्थांचा पाकिस्तान द्वारा जगभर (भारतासकट : एंटर दाऊद!) होणारा व्यापार हा इस्लामिक मूलतत्त्ववादाचा आर्थिक पाया आहे. तो पाक सरकार-सैन्य- ISI च्या सहकार्यानं बळकट केला जातो. वजिरीस्तान भागात, अफगाणिस्तानपाकिस्तान सीमेच्या दोन्ही बाजूंना वावरणारं ‘हक्कानी नेटवर्क’सुद्धा पाकिस्तान सैन्य-सरकार- ISI च्या मदत-मार्गदर्शनाखाली इस्लामिक मूलतत्त्ववादाचा दहशतवादी पाया बळकट करतं. काबूलमध्ये भारतीय दूतावासावर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्ताननं ‘हक्कानी नेटवर्क’च्या माध्यमातून घडवून आणला होता असं आता सिद्ध झालंय. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावू शकले असते – असे माजी राष्ट्राध्यक्ष बुर्‍हाणुद्दिन रब्बानी यांची त्यांच्या काबूलमधल्या राहत्या घरी हत्या घडवून आणण्यामागे ‘हक्कानी नेटवर्क’च्या द्वारा पाकिस्तानी ISI च आहे.मुळात पाकिस्तानच्या बाजूचा भारतविरोधी अमेरिकन तज्ज्ञ ‘स्टीफन कोहेन’नं त्याच्या भारत-पाकिस्तानवरच्या ग्रंथात सांगतो की पार २०४७ मध्ये सुद्धा म्हणजे – १०० वर्षांच्या लढाईनंतर – काश्मिर प्रश्न सुटलेला असेल आणि भारत-पाकिस्तान संबंध सुरळित असतील हे अशक्य आहे. अफगाणिस्तानमधल्या इस्लामिक मूलतत्त्ववादी दहशतवादी लढाईसाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर सैनिकी सामुग्री घ्यायची, पण तिचा वापर भारताविरुद्ध करायचा आणि दहशतवादाविरुद्ध नाटकी लढाई करायची – उलट भारतविरोधी दहशतवादाची जोपासना करायची हे पाकिस्तानचं धोरण असल्याचं स्टीफन कोहेन, ब्रुस रायडल् हे अमेरिकन तज्ज्ञ आपापल्या ग्रंथांत स्पष्टपणे सांगतात. अमेरिकेकडून मिळणाऱ्या लष्करी सामुग्रीचा वापर भारताविरुद्ध केला जातो, हे तर माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या आत्मचरित्रात – ‘इन् द लाईन ऑफ फायर’मध्ये मान्य केलंय.

आता अगदी नुकताच, अमेरिकी महिला पत्रकार कारलोटा गाल यांचा ग्रंथ प्रकाशित झाला – ‘राँग एनिमी’. अमेरिकेची अफगाणिस्तानातून माघारी जायची वेळ जवळ येत चालली. वर्तमान राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या राष्ट्रपतीपदाच्या दोन टर्म्स पूर्ण झाल्यामुळे, घटनात्मक तरतुदीनुसार त्यांना परत राष्ट्राध्यक्ष होता येणार नाही, अशा वेळी अब्दुल्ला अब्दुल्ला विरुद्ध अब्दुल्ला घानी अशी घमासान, विवादास्पद, म्हणून धोकादायक निवडणूक होते आहे. त्यावेळी तालिबानचे हात बळकट करण्याचं काम पाकिस्तान करत आहे. गेली १३ वर्षं अमेरिका अफगाणिस्तानात जी दहशतवादविरोधी लढते आहे, ती ‘राँग एनिमी’विरुद्ध आहे असं कारलोटा गाल यांचं म्हणणं आहे, त्यांच्या मते खरा शत्रू पाकिस्तान आहे. असाच अभिप्राय स्पष्टपणे नोंदवला आहे, अमेरिकेचे माजी लष्करप्रमुख माईक म्युल्लेन् आणि CIA चे प्रमुख लिओन पनेटा यांनीही. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनही म्हणाले आहेत की जगातल्या प्रत्येक दहशतवादी घटनेचे धागेदोरे अंतिमत: कुठेतरी पाकिस्तानात जाऊन मिळतात. त्या पाकिस्तानच्या लेखी मुख्य शत्रू भारत आहे. समान शत्रूविरुद्ध – म्हणून पाकिस्तान-चीन ‘ऑल व्हेदर’ मैत्री – सहकार्य आहे. भारताविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानला ‘स्ट्रॅटेजिक डेप्थ’ हवी. म्हणून अफगाणिस्तामधली राजवट भारताला अनुकूल असणारी नको : प्रतिकूलच हवी, म्हणजे तालिबान. त्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या तालिबानला जोपासत राहायचं, भारतातल्या दहशतवादी कारवायांसाठी वापरायचं हे पाकि धोरण बदलल्याची खात्री बाळगता येणार नाही. पण पाकिस्ताननं जोपासलेला हा दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानवरच उलटू शकतो. तसं झालं तर पाकि अण्वस्त्रं दहशतवाद्यांच्या हातात पडू शकतात – तशी व्यवस्था करून पाकिस्तान हात वर करून मोकळा होऊ शकतो – की हे ‘नॉन-स्टेट’ अ‍ॅक्टर्सचं कृत्य आहे! सर्व धोकादायक शक्यतांना आकार यायला सुरुवात होईल – अमेरिका अफगाणिस्तानमधून माघारी जाईल तेव्हा – किंवा त्यासाठीही थांबायची वेळ येणार नाही –शहीद पाकिस्तानी पत्रकार सईद सलीम शहजाद यानं आपल्या ‘अल् काईदा ते तालिबान’ग्रंथाच्या शेवटाकडे लक्षपूर्वक म्हटलंय की हा अध्याय मी खरा भारतीय वाचकांसाठी लिहीत आहे. २०११ पूर्वीच प्रसिद्ध झालेल्या आपल्या पुस्तकात तो म्हणतो की काही अतिरेकी इस्लामिक शक्ती सातव्या शतकातल्या खलिफा पदाची पुनस्थापना करून जगावर इस्लामिक राज्य स्थापन करण्याच्या कल्पनेनं झपाटलेल्या आहेत. त्यांच्या मते सातव्या शतकात जसा त्या वेळेला दोन बाजूंना असलेल्या दोन बलाढ्य साम्राज्यांचा – पर्शियन आणि बायझेंटाईन – पराभव करून इस्लाम चा विजय झाला तसा आता पुन्हा जगातल्या दोन बलाढ्य साम्राज्यांचा – सोव्हिएत आणि अमेरिकन – पराभव करून जगावर इस्लामचं राज्य स्थापन होण्याची वेळ आलीय. त्या अतिरेकी शक्तींच्या मते निर्णायक लढाई अफगाणिस्तानपासून गंगेच्या खोऱ्यापर्यंतच्या प्रदेशात लढली जाणार आहे.  खिलाफतची पुनस्थापना करण्याचं ध्येय अल् कायदानं सुद्धा पूर्वी जाहीर केलंच होतं. आता अचानक अज्ञातातून वादळाच्या वेगानं ISIS (Islamic State in Iraq & Syria) नं इराकचा भाग जिंकून खलिफा पद जाहीर केलंय.

पुण्यात फरासखान्यापाशी बॉम्बस्फोट झाला. मूळ योजना फसली, नाहीतर मोठी हानी झाली असती, आता शोध चालू आहे दहशतवादी धागेदोरे कुठपर्यंत जातात त्याचा.चार मराठी तरुण अचानक इराकमध्ये ISIS बरोबर असावेत असं निष्पन्न होतंय. पडद्यामागून सूत्रं हलवत ISIS च्या ताब्यातल्या भारतीय नर्सेसना सुरक्षित परत आणलं, यात भारताच्या विदेश-नीतीचा एक विजय निश्चित आहे.

तेंव्हा हे सगळं आठवलं

Monday, July 14, 2014

फुटबॉलचा कुंभमेळा

...आणि आपण सगळेच

 
लेखांक ११९
                 फुटबॉलचा
कुंभमेळा 

सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

                    ब्राझीलसहित दक्षिण अमेरिकेमध्ये फुटबॉलचा जागतिक कुंभमेळा चालू आहे. युरोपियन सार्वभौम कर्जसंकट युरोपियन संघांची विश्वचषकातील कामगिरी : स्पेन, इंग्लंड, इटली या संघांच्या फिफा विश्वचषकामधील कामगिरीमध्ये युरोपियन सार्वभौम कर्ज संकटाचे प्रतिबिंब उमटलेले दिसत आहे. (बेल्जियम आणि स्वित्झर्लंड व ऐतिहासिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या तटस्थ आहेत.)
     रोनाल्डोचा पोर्तुगाल अत्यंत वाईट पद्धतीने हरला. २०१० चा विश्वचषक विजेता स्पेन माजी विजेता वाटलाच नाही. यावेळी स्पेन पहिल्या फेरीतच गारद झाला. स्पेनची आणखी एक भन्नाट युरोपियन संघ हॉलंड म्हणजेच नेदरलँडसने कत्तल केली. इंग्लंडही स्पर्धेबाहेर पडले आहे. इटली कोस्टारिकाकडून हरल्यामुळे बाहेर पडला आहे. फ्रान्स अजून आव्हान टिकवून आहे परंतु यावेळचा फ्रान्सचा संघ नेहमीसारखा ताकदवान वाटत नाही. (प्लॅटिनी किंवा झिनेदीन झिदान असताना जेवढा ताकदवान होता तेवढा) फिफा विश्वचषक स्पर्धा आता कोपा अमेरिकांना स्पर्धा वाटत आहे, जी पूर्वी युरोपियन स्पर्धा वाटत असे.
      हे युरोपियन संघ बहुदा आजच्या युरोपसारखेच थकलेले आणि नियोजनाचा अभाव असलेले दिसत आहेत. खेळातील आणीबाणीच्या क्षणांना उदाहरणार्थ इटली किंवा स्पेन विश्वचषकामधून बाहेर पडत असल्याचे दिसत असताना त्यांच्या खेळामध्ये जोरदार प्रतिआक्रमणांची आग दिसत नव्हती. गोल करण्याची इच्छाशक्ती दिसत नव्हती. खरं म्हणजे थकल्याची जाणीव त्यांच्या हावभावांमधून दिसत हेाती. त्यांना काय करावं कळतच नाही असं वाटत होतं म्हणून वेळ पूर्ण करण्याचे कर्मकांड ते करत असल्यासारखं वाटत होतं.
      जर्मनी हा एकमेव युरोपियन देश सार्वभौम कर्ज संकटाला आरामात आणि आत्मविश्वासाने सामोरा जात आहे. तसाच विश्वचषकामध्येही आत्मविश्वास असणारा एकमेव युरोपियन संघ जर्मनीच वाटतोय. हॉलंडचा संघही उत्कृष्ट क्षमतेचा असला तरी बेभरवशाचा आहे. हा संघ कधी आळशी आणि निष्काळजी कामगिरी करेल हे सांगता येत नाही.
                जर्मन संघाचा खेळही जर्मन व्यक्तिमत्त्वासारखाच विचारी, अचूक आणि शिस्तबद्ध आहे. जर्मन व्यक्तिमत्त्व मला आवडते (हिटलर सोडून) परंतु जर्मन संघाचा फुटबॉलकडे बघण्याचाआधुनिकदृष्टिकोन मला आवडत नाही तो निरस वाटतो.
                वैयक्तिक मला ब्राझीलचा संघ आवडतो. त्यांचा फुटबॉल खेळउत्तर आधुनिक आहे उत्कंठावर्धक, आणि वेगवान, ब्राझीलचा फुटबॉल काव्यमय आहे. त्यांचा खेळ मला (इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील) भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाची आठवण करून देतो. ब्राझीलचे खेळाडू दिसताना निवांत आरामात दिसतात परंतु (किंवा म्हणूनच) त्यांचा खेळ मात्र अत्यंत स्फोटक आहे. अशक्य अशा प्रकारचे गोल करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ती त्यांची क्षमता विरोधी संघांना धडकी भरवणारी आणि त्यातूनच चुका करायला लावणारी आहे. ही सर्व दक्षिण अमेरिकी फुटबॉलचीच वैशिष्ट्ये आहेत. आपण त्यांना लॅटिन दृष्टिकोन असंही म्हणू शकतो.


      युरोपियन फुटबॉल, शास्त्रीय संगीतासारखे असते. तर ब्राझील, उरुग्वे, कोस्टारिका कोलंबिया (आणि मला आठवतंय कोलंबियन ड्रग कार्टेल परंतु शकीरा आश्वस्त करून जाते) अर्जेंटिना (मेस्सीबरोबरच मला आठवतो अर्जेंटिनाचा लष्करी हुकूमशहा पेरॉन, ब्रॉडवे संगीत गायक त्याचंही नाव पेरॉन आणि मॅडोनाने इव्हा पेरॉनची भूमिका केलेला चित्रपट) आणि चिलीसुद्धा (दुर्दैवाने मला आठवतोय चिलीचा लष्करी हुकूमशहा जनरल पिनेशेट आणि साल्वादोर आलेंदेची हत्या) वाटतात उत्साही लॅटिन संगीतासारखे (जेनिफर लोपेज, शकिरा, रिकी मार्टिन आठवा....तुम्ही सर्व दक्षिण अमेरिकी हुकूमशहांना विसरून जाल)
                दुसऱ्या महायुद्धाने जगावरील युरोपचा प्रभाव संपत चालल्याची जाणीव करून दिली.
      सुवेझ कालवा पेचप्रसंगाने (१९५६) ब्रिटन व फ्रान्स आता जागतिक महासत्ता नसल्याचे सिद्ध झाले. हा विश्वचषक सार्वभौम कर्ज संकटासारखाच आकाराला येताना दिसतोय.
                माझं दु: एवढंच आहे की या चित्रामध्ये आजूबाजूला भारत कुठेही नाही. भारत त्या कुंभमेळ्याच्या कुठे आसपास सुद्धा पोचण्याच्या परिस्थितीत नाही. फुटबॉल हा खरा जागतिक खेळ आहे - कारण जगातले बहुतेक सर्व देश फुटबॉल खेळतात. प्रत्येक खंडातून फुटबॉलच्या निवडीच्या फेऱ्या खेळल्या जातात, त्यातून अंतिम फेरीसाठी ३२ देशांची निवड होते. वर्षांत एकदा वर्ल्ड कपचा कुंभमेळा भरतो. भारत १५४ क्रमांकावर आहे. फुटबॉलमध्ये आपण वर्ल्ड कप जिंकणं तर सोडाच, वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीला पात्र होणाऱ्या ३२ मध्येही नाही. आपण आशियात सुद्धा कुठे जिंकण्याच्या आसपास नाही. बहुदा,सार्कमध्ये आपण जिंकू! १२५ कोटींच्या देशाच्या व्यवस्थेतून सध्या तरी जागतिक दर्जाचा फुटबॉल खेळू शकणाऱ्या ११ जणांचा संघ साकार होऊ शकत नाही. कारण ज्या व्यवस्थेतून असे ११ जण आकाराला यावेत अशी सध्या तरी आपली परिस्थिती नाही, असे कुठे कानाकोपऱ्यात ११ जण असलेच तर त्यांच्या गुणवत्तेचा गळा घोटून, त्यांना सुमार दर्जाचे बनवून, नोकऱ्या शोधायच्या दारात भिकारी बनवून टाकणारी आजचीव्यवस्थाआहे. प्रत्येक व्यक्तीतली गुणवत्ता ओळखून, तिला बहरायला संधी देणारी सध्याची व्यवस्था नाही. सर्वांनाछापाचे गणपती बनवण्यासाठी एकाच साच्यात घातल्यामुळे शेवटी माणसाचं माकड बनवणारी ही व्यवस्था होऊन बसलीय. आपल्या समकालीन संस्कृतीमध्ये माणसाला घडवताना, माणसाचं मूल्यमापन करतानागुणवत्ता हा शेवटचाच काय, निकषच नाही. जर असलाच तरगुणवत्ता हा बोनस आहे, ‘गुणवत्ताखपवून घेतली जाईल, पण मुख्य निकष जातपात, पैसा, सत्ता, ओळखीपाळखी... हे आहेत. एकमेकांना कापून काढण्याची कुशलता घडवलेल्या समकालीन संस्कृतीतून जगज्जेते होणाऱ्या ११ खेळाडूंचा संघ कसा काय साकार होणार?
      तसे आपण हॉकीमध्ये जगज्जेते होतो - स्वातंत्र्यपूर्व काळात, ‘गोऱ्या साहेबाच्या मालकीमध्ये गपगुमान राहात होतो, तोवर जगज्जेते. स्वातंत्र्य, सार्वभौत्व मिळवल्यावर हॉकीमधलं आपलं कर्तृत्व काय, तर आधी सुवर्णपदक गमवायला सुरुवात झाली, मग ब्राँझवर समाधानी राहायला शिकलो आपण. मग ज्या देशांना पात्रता फेरी खेळता हॉकीचा वर्ल्ड कप किंवा ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळतो, त्यात आपण आहोत यात गौरव समजायला लागलो. मग पात्रता फेरी खेळावी लागण्याचीही वेळ आली आणि शेवटी ऑलिम्पिक्सच्या इतिहासातला सर्वांत उत्तम ऑलिम्पिक जेव्हा चीन आयोजित करत होता, २००८ मध्ये, तेंव्हा ऑलिम्पिकसाठी पात्र सुद्धा न ठरण्याचं कर्तृत्व करून दाखवलं आपण.
                टीमवर्कमध्ये कमी पडण्याची संस्कृती जोपासलीय आपण सध्या. एकमेकांनापास देताना, आपण एकटीम आहोत आणि जिंकणं हे आपलं सर्वांचं समान उद्दिष्ट आहे असंकिलर इंस्टिंक्ट नसतंच. याला कशाला पास देऊ, हा माझा जातवाला नाही. बरं म्हणून फार जातवाल्यांना एकमेकांबद्दल बंधुभाव असतो असंही नाही, दुसऱ्याचा द्वेष करायला एकत्र येण्याचं नाव म्हणजे जात! याला पास दिला अन् त्यानं गोल मारला, तर त्याला साल्याला क्रेडिट मिळेल - गोल नाही लागला तरी चालेल, पण त्याला पास देणार नाही. कसं मिळणार जगज्जेतेपद? उलट असलेलं जगज्जेतेपद जात जात, त्या खेळातली पात्रता सुद्धा गमावण्याचं कर्तृत्वच आकाराला येणार.
      पण खेळत तर राहायला पाहिजे, कारण त्यात पैसा, परदेशगमन वगैरे संधी आहेत! मग देशाच्या बोडख्यावर बसतं एक दिवस पळपुटं तत्त्वज्ञान :हारजीत महत्त्वाची नाही, सहभाग महत्त्वाचा आहे- खेळायला उतरायचं तर जिंकण्याच्या जिद्दीनंच खेळायचं असतं, मग नाही जिंकलो, तर खचून न जाता, सुधारणा करून, पुन्हा जिंकण्यासाठी सहभागी व्हायचं असतं. पण हे सांगणारीव्यवस्था सध्या तरी नाही. उलट हेकिल्करणारी व्यवस्था आहे.
      त्यामुळे टीमवर्कच्या खेळांत आपण मार खातो. थोडंफार बस्तान बसवून आहोत क्रिकेटमध्ये -क्रिकेट भारतात पॉप्युलर आहे, पण तो काही जागतिक खेळ नाही, खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळणारे देश -१० . वर्ल्डकरता आकडा भरावा म्हणून अफगाणिस्तान, कॅनडा वगैरे इकडून तिकडून गोळा करून आणावे लागातात, तर झिंबाब्वे, केनिया वगैरे एके वेळी बरे वाटणारे देश क्रिकेटपेक्षा देशांतर्गत टोळीयुद्धातला रक्तपात जास्त महत्त्वाचा समजतात. आपण क्रिकेटच्या गल्लीतले आलटून पालटून दादा असतो. त्यातही आता खेळ कमी आणि धंदा, बेटिंग, मॅच फिक्सिंग, राजकारण, हवाला, पार्ट्या, पोरी... असंच अंदाधुंदलीगआलं. आत्ताच्या पिढीमध्ये मात्र क्रिकेटपेक्षा फुटबॉलबद्दल आकर्षण वाढताना दिसतंय. आता ते वर्ल्ड कप पुरतं आहे की नंतरही टिकणारयातून भारतातलं फुटबॉल नीट संघटित होणार आणि मग त्यातून एक जागतिक दर्जाची टीम उभी राहणारहा प्रवास होतो की नाही, हे बघायचं.
      टॅलंट किल् करणाऱ्या व्यवस्थेशी झगडत झगडत कधी कधी एकेकटे चँपियन पुढे येतात. सरासरी एका पिढीतून - टेनिसमध्ये एक रामनाथ कृष्णन्, नंतर एक विजय अमृतराज... संपली यादी. बॅडमिंटनमध्ये एका पिढीला एक नंदू नाटेकर, नंतर एक प्रकाश पदुकोणे आणि शेवटी एक गोपीचंद. ‘नकोशीझालेली एक साईना नेहवाल मुलीच्या जन्माच्या वेदना आणि अडचणींवर मात करत भारताचा झेंडा फडकवत ठेवते. आईच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेुळे एक विश्वनाथन् आनंद बुद्धिबळातला जागतिक चँपियन होण्यापर्यंत पोचतो. अंजली भागवत आणि अभिनव बिंद्रालाशूटिंगमधलं जागतिक विजेतेपद मिळवताना खेळातल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आपल्याव्यवस्थेविरुद्धच जास्त लढावं लागलेलं असतं. मग काय, जिंकणारा समाज घडवणारी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था तयार होण्यासाठी आपल्या परीनं काम करत फुटबॉलचा कुंभमेळा एंजॉय करण्यात मी गढून जातो